सोनपेठ (दर्शन) :-
सोनपेठ तालुक्यातील डिघोळ परीसर, शेळगाव परीसर तसेच उखळी परीसर जवळ जवळ संपुर्ण तालुक्यात 40-50 हरणांच्या कळप एक नाही दोन नाही तर आठ ते दहा कळप तमाम उगवलेला कापुस, सोयाबीन पिकांचा सुपडा -साप करत असुन पिकांचा नाश करत आहेत.शेतकरी राजा पहिले कर्जाने पुन्हा बोगस बियाणाने आणि आता या हरणांच्या कळपांचा वन विभाग लवकरात लवकर बदोबस्त करावे असे अवाहन शिवसेना उपतालुका प्रमुख कुमार चव्हाण यांनी सा.सोनपेठ दर्शन प्रतिनीधी जवळ बोलतांना आपले मत व्यक्त केले.अनेक शेतकऱ्यांच्या पिंकांची नासाडी या हरणांच्या कळपांनी केली आहे.तरी शेतकऱ्यांचा कर्दनकाळ ठरत असलेल्या या हरिणांच्या कळपांचा वन विभाग बदोबस्त करा ? असे अवाहन केले आहे.मा.जिल्हाधिकारी यांना मा.तहसीलदार यांच्या मार्फत निवेदन हि देणार असल्याचे त्यांनी शेवटि सांगीतले.


No comments:
Post a Comment