Tuesday, March 31, 2020
खातेदारांनी बँकेच्या ग्राहक सेवा केंद्राचा वापर करावा -जिल्हाधिकारी
मुंबई, पुण्यावरुन आलेल्या नागरिकांना आवाहन कोरोनाची लक्षणे आढळल्यास तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयाशी संपर्क साधा
सोनपेठ पंचायत समिती सभापती, उपसभापती व प.स.व जि.प.सर्व सदस्यांचे एक महीन्याचे मानधन ग्रामिण रुग्नालयास कोरोनाग्रस्त निवारणार्थ साधन - सामग्रीसाठि 28,800 रुपयांचा धनादेश सुपुर्थ
जिल्ह्यातील सर्व मद्य विक्रीच्या अनुज्ञप्त्या बंद
Monday, March 30, 2020
गरीब व मजूर व्यक्तींनी 'शिवभोजन' योजनेचा लाभ घ्यावा - जिल्हाधिकारी
परभणी / सोनपेठ (दर्शन) :-
कोरोना विषाणूचा प्रसार होवू नये याबाबत दक्षता म्हणून शासनाच्या निर्देशानूसार पात्र शिधापत्रीका धारकांना माहे एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्याचे धान्य वितरीत करण्याची कार्यवाही जिल्हास्तरावरून करण्यात येत आहे.
शिधापत्रिका नसलेल्या व्यक्तींना मोफत व स्वस्त धान्य वितरीतकरण्याबाबत सुचना शासनाकडून देण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे शिधापत्रिका नसलेल्या व्यक्तींची कोणत्याही स्वरूपाची माहिती जिल्हाधिकारी अथवा तहसिल कार्यालयामार्फत संकलीत करण्यात येणार नाही. तरी शिधापत्रिका नसलेल्या व्यक्तींना मोफत स्वस्त धान्य वितरीत करण्यासाठी माहिती संकलीत करण्यात येत असल्याचा व्हाट्सअप व सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारीत होणारा संदेश व नमुना खोटा आहे. असेही स्पष्टीकरण जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आले आहे.
-*-*-*-*-
Sunday, March 29, 2020
हातावरचे पोट असणाऱ्या गोरगरिबांसाठी शालीमार समूहाने पुढे केला मदतीचा हात
एकही गरजू व्यक्ती उपाशी राहणार नाही -जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांचे विविध सेवाभावी संस्थाना आवाहन
घरमालकांनी एका महिन्याचे घरभाडे घेऊ नये - जिल्हाधिकारी दी.म.मुगळीकर
Saturday, March 28, 2020
वसा सामाजीक बांधीलकीचा ; आ.सुरेश वरपुडकर कुटंबियाचा
जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोना कक्षास भेट देऊन विलगीकरण कक्षातील नागरिकांशी साधला संवाद
सोनपेठ दर्शन मदत
मुख्यमंत्री सहाय्यता निधी -कोविड-19 या नावाने स्वतंत्र बँक खाते ; या खात्यात मदत जमा करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन
श्री जैन श्वेतांबर श्री पद्मप्रभु महाराज देवालय ट्रस्ट, पोयनाड तर्फे आरोग्य सुविधांसाठी दोन लाख पंचवीस हजार रुपयांचा धनादेश रायगड - अलिबाग जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द
कोरोना लॉकडाऊन मुळे गस्ती वरील पोलीस मित्रांना रोटरी क्लब सोनपेठ च्या वतीने राजेश गायकवाड हे करतात चहा ची सोय तर ज्ञानेश्वर डमढरे यांनी दिले मास्क
३१ मार्च २०२० रोजी भारतीय स्टेट बँकेच्या सर्व शाखा रात्री 11 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येतील
Friday, March 27, 2020
जिल्हा परीषद प्राथमिक शाळा डिघोळ ची हुमेरा बागवान हिचा ग्रामीण भागात कोरोना विषयी निस्वार्थ असा ही प्रचार प्रसार
जन सेवा मित्र मंडळाच्या वतीने 300 गरजवंत कुटुंब प्रमुखांना 5 किलो तांदळाचे वाटप ; जन सेवा मित्र मंडळाचे सर्व स्तरातून कौतुक
कोरोना महामारीसाठी शिक्षकही सरसावले; एक दिवसाचे वेतन देणार
१०० बेडचे नवीन ग्रामीण रुग्णालय सोनपेठ येथे तत्काळ सुरु करावे - मा. आमदार सुरेश वरपूडकर
१०० बेडचे नवीन ग्रामीण रुग्णालय सोनपेठ येथे तत्काळ सुरु करावे - मा. आमदार सुरेश वरपूडकर
सोनपेठ (दर्शन) :-
कोरोना या वायरसच्या आजारामुळे संपूर्ण जग हतबल झालेले आहे .तीच परिस्थिती महाराष्ट्रात आहे.राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.उद्धवजी ठाकरे व मा.ना.राजेश टोपे राज्याची सध्याची परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळत आहेत. त्याबद्दल मा.ना. उद्धवजी ठाकरे व मा.ना.राजेश टोपे यांचे सर्व प्रथम अभिनंदन केले .
पाथरी मतदार संघातील सोनपेठ तालुक्यात १०० बेडच्या नवीन ग्रामीण रुग्णालयाचे नुकतेच बांधकाम पुर्ण झाले आहे.तरी रुग्णालयाचे उदघाटन झालेले नाही .परिणामी या दवाखान्या साठी लागणारे डॉक्टर, नर्स , परिचर, सफाई कर्मचारी , सेवक ई. तसेच कोणत्याही मशिनरी , फर्निचर , पलंग ई. सुविधा अद्याप नाहीत , कोरोना या साथीच्या आजाराच्या धसक्याने तालुक्यातील लोक भयभित झालेले आहेत.तालुक्यातील लोकांच्या भविष्यातील अडचणीचा विचार करून ग्रामीण रुग्णालाय सोनपेठ येथे तत्काळ डॉक्टरांची संख्या वाढवून या ठिकाणी १०० बेड व इतर आवश्यक असणारी मशनरी व साहित्य त्वरित पाठवावे व ग्रामीण रुग्णालय सुरु करावे अशी विनंती परभणी जिल्हा कॉंग्रेस कामिटी चे अध्यक्ष मा. आमदार सुरेशराव वरपूडकर यांनी लेखी स्वरुपात पत्राद्वारे महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री मा. ना.राजेश टोपे यांना केले आहे व तसेच परभणी जिल्हाधिकारी मा.दीपक मुगळीकर यांना सुद्धा कळविले आहे .
राजेशदादा विटेकर यांची वाढदिवसाचे निमित्त साधुन ग्रामीण रुग्णालयास आगळी-वेगळी 71,000/- हजार रुपयांची मदत
Thursday, March 26, 2020
मुख्यमंत्री साहयता निधी याच खात्यात जमा करावी.निधी स्वरूपात मदत जमा करण्यासाठी
परदेशातून आलेल्या नागरिकांनी माहिती देणे अनिवार्य
परदेशातून आलेल्या नागरिकांनी माहिती देणे अनिवार्य
परभणीकर कोरोना ची लढाई घरातुनच जिंकनार तमाम जनतेनी पोलीस, डॉक्टर, प्रशासकीय कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे - राजेश विटेकर ; कोरोना महामारीला सहज घेऊ नका, गांभीर्य ओळखा
Wednesday, March 25, 2020
जीवनावश्यक वस्तूंचा मुबलक साठा उपलब्ध, नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी करू नये
दोन घास भुकेल्या॓साठी जगुया थोडंसं माणुसकीसाठी ; आपल्याला एकांताची काळजी तर अनेकांना खाण्याची चिंता ; अण्णपूर्णा ट्रस्टचं परळी शहरातील भिक्षुक व निराश्रीतांसाठी ॑ पहिलं पाऊल ; अखंडपणे दोन वेळचे मोफत जेवण
जिल्हा प्रशासनाचे नागरिकांना आवाहन; जीवनावश्यक वस्तूचा साठा मुबलक असल्याने गर्दी टाळावी ; 9 रुग्णांचे स्वॅब पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे तपासणीसाठी पाठविले ; कोरोना बाह्यरुग्ण विभागात 137 संशयित रुग्णांची तपासणी
Tuesday, March 24, 2020
परळी वै 150 वर्षापेक्षा जास्त वर्षाची परंपरा शंभु महादेवाच्या वाघाच्या काठीची मिरवणुक कोरोना वायरसच्या धर्तीवर रद्द!
Monday, March 23, 2020
महाराष्ट्रात येत्या 31 मार्चपर्यंत बंदी आदेश ; अधिसूचना जारी
राज्यात आजपासून संचारबंदी ; जिल्ह्यांच्या सीमा देखील बंद करणार- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात क्रांतिकारक भगतसिंग, सुखदेव व राजगुरू शहीदांना अभिवादन
Sunday, March 22, 2020
जीवनावश्यक वस्तू पुरवठा आस्थापना सुरूच राहणार - जिल्हाधिकारी दी. म. मुगळीकर
Saturday, March 21, 2020
सोनपेठ (दर्शन) :-
जगभर कोरोना या महामारीचे स्वरूप घेत असून त्याला प्रतिबंध करण्यासाठी ते रोखण्यासाठी प्रशासन मोठ्या उपाययोजना करत असतांनाही नागरिक मात्र कोरोनाच्या जीवघेण्या संकटाला गांभीर्याने घेत नसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
जीवघेणा संसर्गजन्य असलेल्या कोरोनाच्या उपद्रवाने आता महामारीचे स्वरूप घ्यायला सुरुवात केली आहे.
महाराष्ट्र राज्य या महामारीच्या दुसऱ्या टप्प्यात आले असून राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या आता पन्नाशी पार करत आहे. राज्यात याने महाभयंकर स्वरूप धारण करू नये यासाठी राज्यशासन आटोकाट प्रयत्न करत आहे.
शासन सर्वच पातळीवर दक्ष राहून या जीवघेण्या रोगाची शृंखला तोडण्याची जोरदार तयारी करत आहे. परंतु नागरिक मात्र या प्रयत्नांना हरताळ फासत असल्याचे दिसून येत आहे.
कोरोना हा रोग एकमेकांच्या संपर्कातून फैलावला जात आहे. त्यामुळे नागरिकांचा संपर्क टाळण्यासाठी नागरीकांनी एकत्र न येण्याबाबत सरकार वारंवार सूचना करत आहे.
त्यासाठी राज्यात १४४ कायदा लागू करून सरकारने कुठल्याही ठिकाणी पाच पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास प्रतिबंध केला आहे. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षितता म्हणून अशा कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत आहे. परंतु स्थानिक नागरिक मात्र या कुठल्याही विषयाला गांभीर्याने घेत नसल्याचे स्पष्ट होत आहे.
दि २१ रोजी जिल्हाधिकारी परभणी यांच्या आदेशानुसार सोनपेठ शहरातील संपुर्ण बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती. यातुन जीवनावश्यक वस्तुची दुकाने भाजीपाला, दुध, किराणा यांची दुकाने वगळण्यात आली होती .नागरीकांचा संपर्क तोडुन कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असतांना आज बंद च्या दिवशी भाजीपाल्याच्या दुकांनांना सुट असल्याने शहरात फिरुन अथवा लांब अंतराने बसुन गर्दी न जमवता भाजी पाला विकण्याचे न प मुख्याधिकारी यांनी तोंडी आदेशित करुनही याकडे भाजीपाला, फळ विक्रत्यांनी दुर्लक्ष करुन डाँ बाबासाहेब आंबेडकर चौकात आपली दुकाने थाटली .त्यात नागरीकांनी आठवडी बाजाराप्रमाने गर्दी केली होती .भाजीपाल्याची दुकाने रोजच उघडी ठेवण्यात येणार असतांना उगाचच नागरीक गर्दी करत आहेत.नागरीकांच्या भितीचा फायदा घेत भाजी विक्रेत्यांनी भाजीचा दर चौपट करुन ग्राहकांची चांगलीच लुट केली .कलम १४४ लागु करण्यात आल्यावर त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी असलेले सोनपेठ पोलीस कोरोना बाबत दक्ष नसल्याचे दिसुन येते बाजारात अनावश्यक गर्दी करणाऱ्या सोबत कुठलीही सक्ती करत नसल्याचे यावरुन दिसुन येते.
कोरोना या रोगासोबत लढण्यासाठी नागरीकांनी स्वयंस्फूर्तीने पुढे होणे गरजेचे असतांना नागरिक बेजबाबदारपणे वागून या रोगाला आमंत्रीतच करत असल्याचे चिञ दिसून येत आहे.तर प्रशासन ही या बाबत फारसे दक्ष नसल्याचे पाहावयास मिळते.





































