Tuesday, December 3, 2019

गेल्या साडेतीन वर्षात महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्पांसाठी 295 कोटींचा निधी ; चालु आर्थीक वर्षात 37 कोटी 9 लाख 55 हजारांचा निधी वितरीत

गेल्या साडेतीन वर्षात महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्पांसाठी 295 कोटींचा निधी ; चालु आर्थीक वर्षात 37 कोटी  9 लाख 55 हजारांचा निधी वितरीत
                 
नवी दिल्ली / मुंबई / परभणी / सोदेनपेठ (दर्शन) :-  

महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्पांसाठी केंद्र पुरस्कृत योजनांमधून गेल्या साडेतीन वर्षात 295 कोटी 13 लाख2 हजार 500 रुपयांचा निधी वितरीत झाला आहे.केंद्रीय वने व पर्यावरण तथा हवामानबदल मंत्रालयाच्यावतीने देशातील 18 राज्यांमधील व्याघ्र प्रकल्पांच्या विकासासाठी गेल्या तीन वर्षात व चालू आर्थिक वर्षात एकूण 1 हजार 221 कोटी 65 लाख 89 हजार 500 रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला आहे. (महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्पांना 295 कोटी 13 लाख )महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्पांसाठी वर्ष 2016-17 ते 2018-19 या मागील तीन आर्थिक वर्षात एकूण 258 कोटी 3 लाख 47 हजार 500 रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला. तर चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत (21 नोव्हेंबर 2019) 37 कोटी  9 लाख 55 हजारांचा निधी वितरीत करण्यात आला आहे.
वर्ष 2016-17 ते 2018-19 या मागील तीन आर्थिक् वर्षात देशातील 18 राज्यांमधील व्याघ्र प्रकल्पांसाठी एकूण 1 हजार 10 कोटी 42 लाख  8  हजार 400 रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला. तर चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत (21 नोव्हेंबर 2019) 211 कोटी 23 लाख 81  हजारांचा  निधी वितरीत करण्यात आला आहे.
केंद्रीय वने व पर्यावरण तथा हवामानबदल राज्य मंत्री बाबुल सुप्रियो यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही  माहिती दिली.

    

No comments:

Post a Comment