नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा.....
परभणी / सोनपेठ (दर्शन) :-
जायकवाडी धरणाच्या उर्ध्व भागातील धरणामधून पाण्याची आवक सुरु असून जायकवाडीच्या पाणलोट क्षेत्रातही पाऊस सुरु असल्याने धरणाच्या पाणीपातळीमध्ये वाढ होत आहे. परिसरातील लघु व मध्यम प्रकल्प, तलाव हे शंभर टक्के भरले असल्यामुळे धरणातील मोठ्या प्रमाणातील पाण्याची आवक पाहता नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
नदीकाठच्या परिसरातील लोकांनी सतर्क रहावे आणि नदीपात्रात जाऊ नये, वाहने व पशुधन नदीपात्रात सोडू नये तसेच कोणत्याही प्रकारची जिवित व वित्तहानी होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती प्राधिकरणाचे सचिव यांनी कळविले आहे.

No comments:
Post a Comment