Thursday, January 23, 2020

युवकांनी नेताजींच्या विचारांचा वारसा आचरणात आणावा - मा.शिवाजीराव मव्हाळे

युवकांनी नेताजींच्या विचारांचा वारसा आचरणात आणावा - मा.शिवाजीराव मव्हाळे
 सोनपेठ (दर्शन) : - 

नेताजी सुभाष चंद्र बोस हे भारताच्या इतिहासातील सुवर्णपान आहे. युवकांनी नेताजींच्या विचारांचा वारसा आचरणात आणल्यास भारत जागतिक महासत्ता होईल. त्याचबरोबर हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे मराठी माणसाच्या इतिहासातील सुवर्णपान असून त्यांनी मराठी माणसासाठी केलेला संघर्ष कधीही विसरला जाणार नाही. असे मत शिवाजीराव मव्हाळे यांनी व्यक्त केली.
       सोनपेठ शहरातील राजीव गांधी महाविद्यालय सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली, यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस अनिल कवटिकवार व किरण स्वामी यांच्या हस्ते सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले प्राचार्य बालाजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली  संपन्न झाला झालेल्या या कार्यक्रमात प्रा.नर्गिस शेख, लायब्रियान रेखा कांबळे, विकास मोरताटे, दिक्षा शिरसाठ, स्वेता चौहान, बाळु भरती, सावित्रीबाई शिंदे, कैलास भालेराव आदीसह
महाविद्यालयातील प्राध्यापक कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी.एस.सी.चा विद्यार्थी कैलाश भालेराव याने केले तर आभार राजकुमार मस्के या विद्यार्थ्याने मानले.

No comments:

Post a Comment