Wednesday, July 31, 2019

मुंशी प्रेमचंद यांचे साहित्य आजही प्रासंगिक - प्रा. डॉ.वनिता कुलकर्णी

मुंशी प्रेमचंद यांचे साहित्य  आजही प्रासंगिक - प्रा. डॉ.वनिता कुलकर्णी

सोनपेठ (दर्शन):-

मुन्शी प्रेमचंद यांचे साहित्य सामान्य मानसाच्या व्यथा व जगन्याचा संघर्ष अधोरेखीत करणारे आहे, सामाजिक मानवी मुल्यांच्या कसोटीवर ते आजही प्रासंगिक असल्याचे मत प्रा. डॉ. वनिता कुलकर्णी यांनी व्यक्त केले, त्या प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होत्या. शहरातील कै. र.व.महाविद्यालयात हिंदी विभागाच्या वतीने मुंशी प्रेमचंद यांची जयंती साजरी करण्यात आली प्रेमचंदाचे साहित्य सामान्य जनतेच्या भावना, समस्या व परिस्थितीचे वर्णन करणारे व विशाल विस्तृत समाजाचे साहित्य आहे आज ही ते प्रासंगिक आहे आशा महान थोर उपन्यासकार व कथाकार ज्यांनी तीनशे पेक्षा जास्त कहानी व 15 उपन्यास लिहून समाजाबद्दलची सहानुभूति दाखवली व जागृति केली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.डॉ.मुक्ता सोमवंशी या होत्या प्रमुख मार्गदर्शक म्हणून विभाग प्रमुख प्रा.डॉ.वनीता कुलकर्णी,प्रमुख पाहुणे राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ.कल्याण गोलेकर, प्रा.अंगद फाजगे हे होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीपान रणदिवे यांनी केले तर आभार कु.रोहिणी कुऱ्हाडे यानी मानले या प्रसंगी हिंदी विभागाचे सर्व विद्यार्थी व विद्यार्थीनी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment