फडनवीसांचा होणार यद्दियुरपा,बहुमत चाचणी आदिच देणार राजीनामा ?
सर्वोच्च न्यायालयाने उद्या बुधवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत खुल्या मतदानाने बहुमत चाचणी घेण्याचे निर्देश दिल्यामुळे महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस सरकार चांगलेच अडचणीत सापडले आहे. अवघ्या 30 तासांत बहुमतासाठी लागणाऱ्या 145 आमदारांची जुळवाजुळ झाली नाही आणि विधानसभा अध्यक्षपदी भाजपचा उमेदवार निवडून आला नाही तर बहुमत चाचणीला सामोरे जाण्याआधीच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. कर्नाटकमध्ये भाजपच्या येद्दियुरपांनीही असेच केले होते.
संविधान दिनाच्या दिवशीच सर्वोच्च न्यायालयाने खुल्या मतदानाने बहुमत चाचणी घेण्याचे निर्देश दिल्यामुळे घोडेबाजाराला फारसा वाव राहिलेला नाही. त्यामुळे 30 तासांत बहुमतासाठी लागणारा 145 आकडा जुळवणे भाजपला म्हणावे तितके सोपे राहिलेले नाही. त्यामुळे बहुमत चाचणी आधी होणारी विधानसभा अध्यक्षाची निवडीवरच भाजपची पुढील रणनीती अवलंबून राहाणार आहे. भाजपचा विधानसभा अध्यक्ष झाला तरच बहुमत चाचणीला सामोरे जायचे आणि तसे झाले नाही तर बहुमत चाचणीला सामोरे न जाताच राजीनामा द्यायचा, अशी भूमिका सध्या भाजपने घेतली आहे.

No comments:
Post a Comment