Monday, July 5, 2021

इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग सुरु करण्यास राज्य सरकारद्वारे मान्यता

इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग सुरु करण्यास राज्य सरकारद्वारे मान्यता




परभणी / सोनपेठ (दर्शन) : - 

राज्यातील कोविडमुक्त क्षेत्रातील ग्रामपंचायती , स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ठरावांच्या आधारे तसेच काही निकषांच्या आधारे पहिल्या टप्प्यात शाळेतील इयत्ता आठवी ते इयत्ता बारावीचे वर्ग सुरु करण्यास राज्य सरकारने सोमवारी (दि.05) एका परिपत्रकाद्वारे मान्यता बहाल केली आहे.
        ग्रामीण भागात कोविडमुक्त गावातील ग्रामपंचायतीने त्यांच्या अखत्यारित असलेले गावातील, शाळेतील इयत्ता आठवी ते इयत्ता बारावीचे वर्ग सुरु करण्याबाबत पालकांशी चर्चा करुन ठराव करावा. शाळा सुरु करतांना मुलांना टप्प्या टप्प्याने शाळेत बोलविण्यात यावे. उदा. वर्गांना अदलाबदलीच्या दिवशी, सकाळी-दुपारी, ठरावीक कोर विषयासाठी प्राधान्य ठेवावे. तसेच सोबत दिलेल्या संकेतांचे काटेकोरपणे पालन करावे. उदा. एका बाकावर एकच विद्यार्थी, दोन बांकांमध्ये सहा फूट अंतर, एका वर्गात जास्तीत जास्त 15 ते 20 विद्यार्थी, सतत हात साबनाने धुणे, मास्कचा वापर, कोणतेही लक्षणे असल्यास विद्यार्थ्यांना घरी पाठविणे व लगेच कोरोना चाचणी करुन घेणे इत्यादी बाबींचे काटेकोरपणे पालन केले जावे. संबंधित शाळेतील शिक्षकांची राहण्याची व्यवस्था शक्यतो त्याच गावात करण्यात यावी किंवा त्यांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर न करण्याबाबत दक्षता घ्यावी, असे स्पष्ट निर्देश राज्याच्या शालेय शिक्षण व क्रिडा विभागाचे सहसचिव राजेंद्र पवार यांनी दिले आहेत.

No comments:

Post a Comment