किसानपुत्र आंदोलनाच्या राज्य स्तरीय चिंतन शिबिरात ठरणार लढ्याची रणनीती
परभणी / सोनपेठ (दर्शन) :-
किसानपुत्र आंदोलनाचे दोन दिवसांचे राज्य स्तरीय चिंतन शिबीर 17 व 18 जुलै रोजी परभणी जिल्ह्यातील पोखर्णी (नृसिंह) येथे आयोजित करण्यात आले आहे.
शेतकरीविरोधी (सीलिंग, आवश्यक वस्तू, जमीन अधिग्रहण) कायदे रद्द व्हावेत यासाठी किसानपुत्र आंदोलन ही एक चळवळ आहे. या चिंतन शिबिरात शेतकरीविरोधी कायदे रद्द करण्यासाठी रणनीती ठरवणार आहेत.
किसानपुत्र आंदोलनाच्या कामाचा व्याप वाढल्यामुळे विविध आघाड्या उघडण्यात आल्या आहेत. या शिबिरात या आघाड्याची पुनररचना केली जाणार आहे. न्यायालयीन, संसदीय, जनआंदोलन आदी आघाड्यांचे प्रमुख चर्चेत भाग घेणार आहेत.
शिबिरात राज्यातील विविध जिल्ह्यातील साठ प्रमुख आंदोलक भाग घेणार आहेत. परभणी जिल्ह्यातील सुभाष कच्छवे हे निमंत्रक असून मोहन लोहट शिबीर संयोजक आहेत. नितीन राठोड (पुणे), अमर हबीब (आंबाजोगाई), अमीत सिंग (सातारा-पुणे), ऍड महेश गजेंद्रगडकर (पुणे), असलम सय्यद (पुणे) संदीप धावडे (वर्धा), डॉ आशिष लोहे (अमरावती) राजीव बसरगेकर (नवी मुंबई), अनंत देशपांडे (लातूर-पुणे), शिवाजीराव गावंडे (हिंगोली), दीपक नारे (नागपूर) गजानन वाघमारे (यवतमाळ) आदी मान्यवर विविध सत्रात भाग घेणार आहेत.
शेतकऱयांच्या आत्महत्याना राष्ट्रीय आपत्ती मानून सरकारने त्यावर अग्रक्रमाने विचार करावा शेतकरीविरोधी नरभक्षी कायदे रद्द करणे हा देश बळकट करण्याचा कार्यक्रम आहे, अशी किसानपुत्र आंदोलनाची भूमिका आहे.
-----

No comments:
Post a Comment