Friday, July 16, 2021

अपयश आले म्हणून घाबरून न जाता यशासाठी पुन्हा प्रयत्न करावेत - दर्शन निकाळजे

अपयश आले म्हणून घाबरून न जाता यशासाठी पुन्हा प्रयत्न करावेत - दर्शन निकाळजे


सोनपेठ (दर्शन) :- 

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ संलग्न कै. रमेश वरपुडकर महाविद्यालयात दीक्षांत समारंभाचे दि.16 जुलै रोजी आयोजन करण्यात आले होते, प्रमुख मार्गदर्शक म्हणून उप विभागीय अधिकारी दर्शन निकाळजे हे होते, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे हशिप्रमंचे अध्यक्ष परमेश्वर कदम, अप्पर तहसीलदार ऐश्वर्या गिरी तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य वसंत सातपुते होते.अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष समन्वयक प्रा.डाॅ.मुकुंदराज पाटील, परीक्षा प्रमुख प्रा. डॉ.शिवाजी वडचकर हे मंचावर उपस्थित होते.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या कै.रमेश वरपूडकर महाविद्यालयात पदवीधारक विद्यार्थ्यांसाठी दीक्षांत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते, या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून दर्शन निकाळजे उप विभागीय अधिकारी  मार्गदर्शन करताना त्यांनी कुठल्याही सजीवाला आपले आयुष्य यशस्वी जगण्यासाठी सक्षमता मिळवावी लागते, मानवासाठी ही सक्षमता शिक्षणा मधून आत्मसात करता येते, अलीकडच्या काळात विकसित जगामध्ये करियर ही महत्त्वाची बाब आहे परंतु त्याचबरोबर आपले जीवन अनमोल आहे त्यामुळे करिअर कडे गंभीरपणे पहा पण आयुष्यात गंभिर बनून चुकीच्या बाबी करू नयेत, अपयश आले म्हणून घाबरून न जाता यशासाठी पुन्हा प्रयत्न करावेत, असे मार्गदर्शन केले.या प्रसंगी अप्पर तहसीलदार ऐश्वर्या गिरी यांनी आपल्या जीवनामध्ये आनंद आणि समाधान या बाबी माणसांने इतरांना त्यांच्या चांगल्या ध्येयापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण केलेली मदत त्यांच्या चेहर्‍यावर हास्य निर्माण करते त्यावेळी मिळतात म्हणून माणसांनी एकमेकांना चांगल्या कामात सहकार्य केले पाहिजे, आपण आपल्या ज्ञानाचा उपयोग मानवी समाजाच्या हितासाठी केला पाहिजे, असे मत व्यक्त केले.अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ वसंत सातपुते यांनी अनेक लोक यशस्वी होतात, ते आपण पाहतो पण अनेक वेळा अपयशी झाल्यानंतरही प्रयत्न न सोडता, शेवटी यशाचे अत्युच्च शिखर गाठणारे, अनेक यशस्वी लोक या जगामध्ये आहेत. त्याप्रमाणे ध्येय निश्चित करून यशासाठी प्रयत्न करावेत असे मत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सखाराम कदम, कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा डॉ शिवाजी वडचकर तर आभार आयक्यूएसी समन्वयक प्रा डॉ मुकुंदराज पाटील यांनी मानले, कार्यक्रमाच्या आयोजनात प्रा. संदीपकुमार, देवराये  यांच्यासह महाविद्यालयातील संपूर्ण प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांचा सहभाग होता.

No comments:

Post a Comment