Saturday, May 8, 2021

वांगी घाटावरुन नियम डावलत पाच ते सहा मशिन व्दारे दर दिवशी हजारो ब्रास रेतीचा ऊपसा...!
जिल्हा प्रशासनासह तालुका प्रशासनाची ही डोळे झाक.....





परभणी / मानवत / सोनपेठ (दर्शन) : -

एकीकडे सद्यस्थितीत कोव्हीड-१९ चा प्रादर्भाव जिल्हाभरात वाढत आहे.याचेच कारण देत गोदा पात्रातील गौनखनिजा कडे मानवत महसुल प्रशासन जाणिव पुर्वक दुर्लक्ष करत असल्याचे समोर येत असून तालुक्यातील वांगी येथील रेती घाट फेब्रुवारी महिण्या पासुन सुरू असुन या ठिकाणी नियमांची पायमल्ली करत हसल विभागातील झारीतील शक्राचार्यांना हाताशी धरून दर दिवशी पाच ते सहा पोकलेन, जेसबी मशिन च्या साह्याने बेसुमार वाळूऊपसा होत असून यात महसुल चे अधिकारी स्वत:चे उखळ पांढरे करून घेत असल्याची चर्चा सर्वत्र होत आहे. या वषयी मनसेचे जिल्हाध्यक्ष शेख राज यांनी निवेदन देऊन ही या वर कर्यवाही झाली नसल्याने वांगी घाटावरुन दर दिवशी हजारो ब्रास रेतीचा अवेद्य पण दिवस रात्र उपसा होतांना दिसून येत आहे. यात शासनाच्या करोडो रुपयांचे नुकसान होत आहे.मानवत तालुक्यातील वांगी घाटाचा लिलाव जानेवारी महिण्यात संपन्न झाला होता. या वेळी सहा हजार शंभर ब्रास वाळूचा लिलाव करून संबंधित रेती घाट उपसण्यास महसुल प्रशासनाने परवानगी दिली होती. सरुवाती पासुनच या रेती घाटावरुन नियम डावलत रेती उपसा सुरू होता. मजुरां व्दारे रेती उपसा करून दोन ब्रास वाळू ला एक पावती देण्यात येणे गरजेचे असतांना या ठिकाणा वरुन पाच ते सहा पोकलेन आणि जेसीबी मशीन च्या साह्याने राजरोस दिवस रात्र रेती उपसा आजही सुरू आहे. दर दिवशी तीनशे ते चारशे हायवा ट्रक व्दारे तीन ते सहा ब्रास रेती ऊपसा सरु असून दर दिवशी दिड दोन हजार ब्रॉस वळूचा ऊपसा होतांना दिसत आहे. सुर्योदया पसून सूर्यास्ता पर्यंतच नदी पात्रातून रेती उचलन्यास परवानगी असते इथे मात्र दिवस रात्र रेती उपसा सुरू आहे.
शुक्रवारी याठिकाणा हुन भरधाव वेगात रेती नेणा-या टिप्परने मोटार सायकल लाधडक दिली त्यात मोटार सायकल चालक जाधव नामक व्यक्ती जागिच ठार झाला असून त्यांची पत्नी दवाखाण्यात मृत्यूशी झुंज देत आहे. या ठकाणचे सीसीटव्ही बंद आहेत. चार मे रोजी पाथरीचे उपविभागिय अधिकारी दर्शन निकाळजे यांनी पाथरी तालुक्यातील गौडगाव शिवारात नदी पात्रात वाळू माफीयां वर कार्यवाही करत पाच जनांवर पाथरी पोलीसात गुन्हा दाखल केला मात्र, इकडे वांगी घाटावर वैद्य ठेक्याच्या नावा खाली सर्रास पणे नियम डावलून ठरऊन दिल्या पेक्षा किती तरी पटीने वाळूचा उपसा झालेला असतांना ही या गंभिर बाबी कडे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्याची सर्वत्र चर्चा होत आहे. मनसेचे जिल्हाध्यक्ष शेख राज यांनी २३ मार्च रोजीच जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांना निवेदन देऊन या ठिकाणी कार्यवाही करण्या साठी निवेदन दिले होते मात्र या निवेदनाकडे महसुल परशासनाने जानिव पुर्वक दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. या ठिकाणचा वाळू धक्का त्वरीत बंद करण्यात यावा अशी मागणी होत आहे.

No comments:

Post a Comment