मा.नवाब मलीक यांना "जनता दरबार" येथे राष्ट्रीयकृत बँक एसबीआयची सोनपेठ साठी दुसऱ्या शाखेची श्रीकांत विटेकर यांची मागणी
परभणी / सोनपेठ (दर्शन) :-
मा.ना.नवाबजी मलीक साहेब,मंत्री,अल्पसंख्याक विकास विभाग महाराष्ट्र राज्य,मुंबई तथा पालकमंत्री,परभणी जिल्हा यांना श्रीकांत उत्तमराव भोसले (विटेकर) नगर परिषद सदस्य सोनपेठ यांनी "जनता दरबार" जिल्हाधिकारी कार्यालय परभणी येथे राष्ट्रीयकृत बँक एसबीआयची सोनपेठ साठी दुसरी शाखा देणे बाबतचे निवेदन देण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा अध्यक्ष तथा आ.बाबाजानी दुर्रानी व मा.जि.प.अध्यक्ष तथा सभापती राजेशदादा विटेकर उपस्थीत होते.निवेदनात सोनपेठ शहरात एसबीआय व एसबीएच अशा असलेल्या दोन शाखांचे विलीनीकरणात एकच शाखा झाल्याने व्यापारी,शेतकरी, पगारदार,नागरिक व निवृत्ती वेतनधारक वृध्दांना जास्त त्रास सहन करावा लागत आहे.1.5 लाख लोकसंख्येचा सोनपेठ तालुका सह पाथरी तालुका व परळी तालुक्यातील काही भाग या बैंकेवर विसंबून आहे.त्यामूळे येथे सदैव गर्दी राहते.एकच शाखा असल्याने 50 टक्के शेतकरी जानेवारी महिना आला तरी खरीपाच्या पीक कर्जापासून वंचित आहेत.रब्बीच्या पीक कर्जाच तर खरच नाही. जिल्हयात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे थकीत कर्ज,10 टक्के
रक्कम भरना ओटीएस मध्ये माफ होत असताना सोनपेठ मध्ये मात्र कुठल्याही कामासाठी शेतीची कामे सोडून तासनतास रांगेत रहावे लागत आहे.महाराष्ट्र शासनाच्या कोविट-19 विषयी सामाजिक अंतर तर एकच शाखा व लाखो ग्राहक असल्याने पाळणे शक्य दिसत नाही. व्यापाऱ्यांना छोटयाशा कामासाठी बँकेत दिवस घालावा लागतो.कुटुंब निवृत्ती वेतनासाठी वृध्द तासनतास रांगेत असतात.एसबीआय मध्ये काम होत नाही म्हणून अनेकांना खाजगी जवहार करावे लागत आहेत.तरी शहर व तालुका सोनपेठ चा आवाका लक्षात घेता सोनपेठ शहरात राष्ट्रीयकृत बँक एसबीआयच्या दुसऱ्या शाखेची नितांत गरज आहे.तरी या संबंधी मा.साहेबांनी लक्ष घालून पाठपुरावा करावा.अशी विनंती केलेली आहे.

No comments:
Post a Comment