Saturday, December 17, 2022

बहुजन बांधवांनो वैचारिक ठेवा जतन करण्यासाठी चलो परभणी - अंकुशराव परांडे

बहुजन बांधवांनो वैचारिक ठेवा जतन करण्यासाठी चलो परभणी - अंकुशराव परांडे

 
सोनपेठ (दर्शन) :-

सोनपेठ तालुका मराठा सेवा संघ आयोजित राज्यस्तरीय महाअधिवेशन संदर्भात बैठक संपन्न, दि:15/12/2022 रोजी मराठा सेवा संघ तालुका शाखा सोनपेठ राज्यस्तरीय महाअधिवेशन संदर्भात लाईफ लाईन कोचिंग,परळी रोड सोनपेठ, या ठिकाणी बैठक ठिक संध्याकाळी 7:00 वा. घेण्यात आली. यावेळी मराठा सेवा संघ सोनपेठ तालूका अध्यक्ष अंकूशराव परांडे सरांनी बहुजन बांधवांना वैचारिक ठेवा जतन करण्यासाठी चलो परभणी असा नारा देत दि.23,24 व 25 तिन दिवसीय राज्यस्तरीय महाअधिवेशन
राजलक्ष्मी लॉन्स, पाथरी रोड परभणी. {डेन्टल कॉलेजच्या बाजूला} संपन्न होणार आहे.अधिवेशनाविषयी सखोल माहीती देऊन कार्यक्रम यशयस्वी करण्यासाठी सोनपेठ तालूक्यातून  मोठ्या संख्येने यूवा वर्ग, स्वयंसेवक,महीलांनी शूध्दा आपली प्रार्थनीय उपस्थित दाखवायची आहे असे संबोधून, सेवासघांची पूढील वाटचाल कशी आहे म्हणजेच {उदा.आर्थिक दूर्बलांसाठी शिक्षणासाठी शाळा, निवासी व्यवस्था,ग्रंथालय} असे सखोल मार्गदर्शन केले.तसेच अधिवेशनाला तालूक्यातून शहरातून व ग्रामीण भागातून अधिकाधिक निधी कसा जमा होईल याविषयी चर्चासत्रातून नियोजन करण्यात आले.यावेळी आभार प्रदर्शन श्री जाधव सरांनी केले, कार्यक्रमाला मराठा सेवासंघ तालूका सचिव पंजाबराव सुरवसे, आदोडे सर, प्रशांत होशनाळे सर,गौरव जाधव सर,आरगडे सर,प्रा. जिवन भोसले सर, मोरे सर,मकने सर, योगेश जाधव सर,सोनपेठचे प्रसिध्द व्यापारी राजाभाऊ लांडे उपस्थित होते.

प्राचार्य डॉ.वसंत सातपुते यांना यावर्षीचा महात्मा गांधी नॅशनल अवॉर्ड जाहीर

प्राचार्य डॉ.वसंत सातपुते यांना यावर्षीचा महात्मा गांधी नॅशनल अवॉर्ड जाहीर


सोनपेठ (दर्शन) :-

कै. रमेश वरपुडकर महाविद्यालयाचे मार्गदर्शक  प्राचार्य डॉ. वसंत सातपुते यांना यावर्षीचा महात्मा गांधी नॅशनल अवॉर्ड फॉर अडमिनिस्ट्रेटर ऑफ द इयर 2021' हा पुरस्कार जाहीर झाला आहे.हा पुरस्कार दरवर्षी भारतीय प्रशासकाला त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी दिला जातो. या पुरस्काराला साजेसे प्राचार्य डॉ. वसंत सातपुते हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे इंग्रजी विषयातील  लेखक, संशोधक आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतातील च नव्हे तर भारताबाहेरील विद्यार्थ्यांनी ही पी. एच् डी. प्राप्त केल्या आहेत. महाविद्यालयाचा नावलौकिक वाढवण्यासाठी सातत्याने विविध शैक्षणिक प्रयोग करून परिसरातील विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी, सर्व सहकाऱ्यांना बरोबर घेऊन एक कुशल प्रशासक म्हणून कार्य करत आहेत, त्यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्था अध्यक्ष परमेश्वर कदम उपाध्यक्षा ज्योतीताई कदम, कै रमेश वरपूडकर वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालय सर्व प्राध्यापक, प्राध्यापीका, शिक्षकेतर कर्मचारी, साप्ताहिक सोनपेठ दर्शन परीवार आदिसह सर्व स्तरातून अभिनंदन होताना दिसत आहे.

Friday, December 16, 2022

माझ्या शहरासाठी माझे योगदान न.प.आयोजित विविध स्पर्धेत सहभाग नोंदवा - विठ्ठल केदारे

माझ्या शहरासाठी माझे योगदान न.प.आयोजित विविध स्पर्धेत सहभाग नोंदवा - विठ्ठल केदारे


सोनपेठ (दर्शन) :- 

स्वच्छ भारत अभियान व माजी वसुंधरा अभियान तसेच मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे अमृत महोत्सवी वर्षा अंतर्गत सोनपेठ नगर परिषद आयोजित विविध स्पर्धेत सहभाग नोंदवावा असे आवाहन कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी विठ्ठल केदारे यांनी केले आहे.मा. उपविभागीय अधिकारी तथा प्रशासक शैलेशजी लाहोटी यांच्या मार्गदर्शनात "स्वच्छ अंगण सुंदर पैठणी" स्पर्धा या स्पर्धेत प्रत्येक वार्ड मधील आपले घर स्वच्छ ठेवते ती ग्रहीणी सहभाग नोंदवून परीक्षणांती प्रत्येक वार्डा मध्ये एक पैठणी बक्षीस जिंकावी तसेच "माझ्या शहरासाठी माझे योगदान" "स्वच्छ,सुंदर वार्ड" स्पर्धा यामध्ये महिला बचत गट, मित्र मंडळ , सामाजिक संस्था अथवा वार्ड मधील विविध ग्रुप सहभाग नोंदवून परीक्षणांती पहिले बक्षीस रोख 11,111/- तसेच इतर तीन बक्षिसे जिंकू शकता, "स्वच्छ इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी चॅलेंज" स्पर्धा यामध्ये सामाजिक संघटना विविध ग्रुप नागरिकांनी सहभाग नोंदवावा तसेच भिंतचित्र रेखाटन स्पर्धा व आपल्या कलागुणांना वाव, वृध्दिंगत करा आपल्या सोनपेठ शहराचे नाव यामध्ये जिंगल स्पर्धा, शॉर्ट मूव्ही स्पर्धा, पोस्टर स्पर्धा, पथनाट्य स्पर्धा व म्युरल स्पर्धा अशा विविध कलाकृती जमा करण्यासाठी दिनांक 19 /12 /22 सोमवार पर्यंतच मुदत स्पर्धा दुसऱ्या दिवशी दि.20/12/22 स्पर्धेचे ठिकाण छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक सभागृह येथे मंगळवार रोजी सकाळी 10 ते 11:30 होतील तरी उपरोक्त सर्व अशा विविध स्पर्धेसाठी गृहिणीने, महिला बचत गटांने व मित्र मंडळ व संघटनांनी तसेच स्थानिक ग्रुप यांनी लवकरात लवकर नोंदणी करावी शेवटची तारीख दि.20 डिसेंबर 22 मंगळवार पर्यंत आहे.नोंदणी साठी संपर्क सचिन पोरे मो.9156147146 साधावा.

Sunday, December 11, 2022

कै.विष्णुपंत रामभाऊ गट्टी यांचे वृद्धापकाळाने निधन

कै.विष्णुपंत रामभाऊ गट्टी यांचे वृद्धापकाळाने निधन

सोनपेठ (दर्शन) :-

सोनपेठ शहरातील प्रसिद्ध व्यापारी तसेच श्री पार्डिकर महाविद्यालय सिरसाळाचे प्राध्यापक डॉ गणपत गट्टी यांचे वडील आणि डॉ दिपक गट्टी यांचे आजोबा कै.विष्णु गट्टी यांचे दि.10 डिसेंबर रोजी वयाच्या 96 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांना डॉ गणपत, अनिल, रमेश हि तीन मुल व एक मुलगी उषा आहेत.
गीतांजली, पांडुरंग, ऋषिकेश, ऋतुजा, आकाश,आस्था,गोविंदराज, डॉ दीपक 
हे नातू आहेत.मधुकर,सत्यप्रेम हे त्यांचे पुतणे आहेत.असा त्याचा मोठा परीवार आहे. यांच्यावर अंतिम संस्कार दिनांक 11 डिसेंबर रोजी परभणी येथील सार्वजनिक स्मशानभूमी येथे करण्यात आले आहेत,गट्टी परिवार यांच्या दुःखात साप्ताहिक सोनपेठ दर्शन परिवार सहभागी आहे.

नाझमीन रशीद शेख मैदानी स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम

नाझमीन रशीद शेख मैदानी स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम
सोनपेठ (दर्शन) :-

कै.र.व.कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थीनी नाझमीन रशीद शेख हीने परभणी येथे झालेल्या शालेय क्रीडा स्पर्धेत २०० मीटर धावणे या मैदानी स्पर्धेत परभणी जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे, तिच्या यशाबद्दल ह.शि.प्र.मंडळाचे अध्यक्ष परमेश्वर कदम,उपाध्यक्षा ज्योतिताई कदम,प्राचार्य डॉ.वसंत सातपुते,प्राचार्या शेख शकीला,डॉ.मुकुंदराज पाटील,क्रीडा संचालक डॉ.गोविंद वाकणकर,जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार,तालुका क्रिडा संयोजक शिवाजी तळेकर,क्रिडा संघ व्यवस्थापक प्रा.कैलास आरबाड,प्रा.एम.डी.मेहत्रे,प्रा.एस.डी. वाघमारे,प्रा.सुरेश मोरे,प्रा.संतोष वडकर यांच्या सह साप्ताहिक सोनपेठ दर्शन तसेच सर्वस्तरातून अभिनंदन होताना दिसत आहे.

Saturday, December 10, 2022

बालासाहेब सोनवणे यांची लाल बावटा शेतमजूर युनियनच्या तालुका अध्यक्षपदी निवड

बालासाहेब सोनवणे यांची लाल बावटा शेतमजूर युनियनच्या तालुका अध्यक्षपदी निवड


सोनपेठ (दर्शन) :-

सोनपेठ शहरातील सामाजिक कार्यकर्ते सोनवणे बालासाहेब वैजनाथ यांचें ग्रामीण मंजूर व मागास वर्गीय यांच्यासाठी करित असलेल्या कर्याबद्दल आणि गायरान धारकांच्या लढ्यामध्ये त्यांचे भरीव योगदान पाहुन.याकामाची दखल घेवून आणि सोनपेठ तालुक्यातील शेतमजूर व भूमिहीन यांचा लढा गतिमान करण्याच्या हेतूने बालासाहेब सोनवणे यांची लाल बावटा शेतमजूर युनियनच्या तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात येत आहे.येत्या काळात लाल बावटा शेतमजूर युनियनचे संमेलन घेवून तालुका कार्यकारीणी तयार करण्याची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात येत आहे.असे पत्र कॉम्रेड राजन क्षीरसागर कार्याध्यक्ष लाल बावटा शेतमजूर युनियन यांनी देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत या निवडीबद्दल बालासाहेब सोनवणे यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होताना दिसत आहे.

सोनपेठ येथे मा.श्री.शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त खुल्या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

सोनपेठ येथे मा.श्री.शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त खुल्या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन


सोनपेठ (दर्शन) :-

सोनपेठ शहरात प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी राष्ट्रवादी युवक काँग्रेस सोनपेठ आयोजित मा.श्री.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या 82 व्या वाढदिवसा निमित्त वर्ष 10 वे "भव्य खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा" आयोजक राष्ट्रवादी युवक कांग्रेस,सोनपेठ‌.मा.राजेश दादा विटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मा.ॲड.श्रीकांत विटेकर यांच्या नेतृत्वाखाली उद्घाटन सोमवार दि.19/12/2022 रोजी सकाळी 10:10 मिनिटांनी स्थळ गणेश जीनींग मैदान, शेळगाव बायपास रोड,सोनपेठ.होईल.या खुल्या क्रिकेट स्पर्धेचे 1 ले बक्षीस 85,555/- तर दुसरे बक्षीस 55,555/-, मॅन ऑफ द सिरीज 7001/-, बेस्ट बॉलर 5001/-, बेस्ट बॅट्समन 5001/-,मॅन ऑफ द मॅच 3001/-, इन्ट्री फीस 1100/- रुपये राहिल.कमेटी संपर्क 7744013000,नियम व अटी- 1) पंचांचा निर्णय अंतिम राहील.2) खेळाडूंनी साहित्य सोबत आणावे. 3) खेळाडूची जीवितहानी जिम्मेदारी स्वतःवर राहील. 4) प्रत्येक सामना 8 षटकांचा राहील व अंतिम सामना 12 षटकांचा राहील. 5) दिलेल्या वेळेवर संघ हजर नसल्यास त्या संघास बाद घोषित करण्यात येईल) प्रत्येक सामन्याला कमिटीचा बॉल वापरावा लागेल. 7) हरलेला खेळाडू डबल खेळलेला आढळल्यास बाद करण्यात येईल. 8) फेकी (जर्क) बॉलिंग कदापि मान्य केली जाणार नाही.9) अंतिम निर्णय कमेटीचा राहील.लवकरात लवकर संपर्क साधावा उंबरे मोबाईल शॉपी 9595243048,आण्णा ग्राफिक्स 9049636000,वैष्णवी ज्वेलर्स 8698742222,भाऊ ज्वेलर्स 9423222562 आदिंना संपर्क साधावा.राष्ट्रवादि युवक काँग्रेस शहराध्यक्ष अशोक भुसारे व सर्व पदाधिकारी कार्यकर्ते परीश्रम घेताना दिसुन येत आहेत.

साप्ताहिक सोनपेठ दर्शन बातम्या व जाहिराती साठी संपर्क साधावा संपादक किरण रमेश स्वामी सोनपेठ मो.9823547752.

Monday, December 5, 2022

डिघोळमध्ये विकासकामांचा धडाका ! युवानेते उपसरपंच अजयकुमार देशमुख यांच्या माध्यमातून विविध विकासकामे प्रगतीपथावर डिघोळच्या मुख्य रस्त्यासाठी आ.बाबाजानी दुर्राणी यांचा भरघोस निधी

डिघोळमध्ये विकासकामांचा धडाका ! युवानेते उपसरपंच अजयकुमार देशमुख यांच्या माध्यमातून विविध विकासकामे प्रगतीपथावर
डिघोळच्या मुख्य रस्त्यासाठी आ.बाबाजानी दुर्राणी यांचा भरघोस निधी

सोनपेठ (दर्शन) :-

सोनपेठ तालुक्यातील डिघोळ येथे विविध विकासकामांना युवानेते तथा उपसरपंच अजयकुमार देशमुख यांच्या प्रयत्नातून सुरुवात झाली आहे.तर विविध विकासकामे प्रगतीपथावर आहेत.गावाच्या सर्वांगिण विकासाचा विडा उचललेल्या देशमुख यांच्या नेतृत्वावर भविष्यात प्रत्येक निवडणुकीत विश्वास दाखवण्याचे आवाहन यावेळी विधानपरिषदेचे आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी साप्ताहिक सोनपेठ दर्शनशी बोलतांना व्यक्त केले.सोनपेठ तालुक्यातील विविध गावात आ.दुर्राणी यांच्या प्रयत्नातून भरघोस निधी उपलब्ध झाला असल्याने या गावातील महत्वाकांक्षी कामे मोठ्या प्रमाणात मार्गी लागतील अशी अपेक्षा यावेळी उपसरपंच अजयकुमार देशमुख यांनी बोलतांना व्यक्त केली.पुढे त्यांनी असे सांगितले की,मागील पंचवीस वर्षांपासून डिघोळ येथे मुख्य रस्ता नसल्याने ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागत असे.विशेषतः पावसाळ्यात याचा अधिकचा त्रास होता आजपर्यंत लोकप्रतिनींनी केलेले अक्षम्य दुर्लक्ष आणि ग्रामस्थांची मागणी होऊनही करण्यात येत नसणाऱ्या रस्त्यासाठी आ.बाबाजानी दुर्राणी यांनी पुढाकार घेत निधी दिला आहे.या रस्त्याचे काम नुकतेच सुरु करण्यात आले असून ग्रामस्थांच्या विश्वासाला सार्थ ठरवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे अजयकुमार देशमुख यांनी यावेळी सांगितले.या कार्यक्रमासाठी जेष्ठ नागरीक,पदाधिकारी, मित्रमंडळाचे प्रतिनिधी सदस्य,सरपंच प्रतिनिधी भागवत शिंगाडे, ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती.

Tuesday, November 29, 2022

दिव्यांगासाठी सोनपेठ येथील जिल्हा परिषद केंद्रीय कन्या शाळा शाळेत कार्यशाळेचे आयोजन

दिव्यांगासाठी सोनपेठ येथील जिल्हा परिषद केंद्रीय कन्या शाळा शाळेत कार्यशाळेचे आयोजन


सोनपेठ (दर्शन) :-

सोनपेठ तालुक्यातील दिव्यांगासाठी दिव्यांग दिनाच्या निमित्ताने विविध शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी दि.१ डिसेंबर २०२२ गुरुवार रोजी जिल्हा परिषद केंद्रीय कन्या शाळेत मार्गदर्शक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.सक्षम व कृषी प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने सोनपेठ तालुक्यातील दिव्यांग (विकलांग) व्यक्तींना विविध शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी दि. १ डिसेंबर गुरुवार रोजी दुपारी १ वाजता सोनपेठ येथील जिल्हा परिषद केंद्रीय कन्या शाळेच्या ई लर्निंग समागृहात एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेत दिव्यांगांना इंदीरा गांधी राष्ट्रीय विकलांग योजना व संजय गांधी निराधार योजने अंतर्गत अर्थसहाय्य मिळण्यासाठी लागणारी सर्व कागदपत्रे तसेच विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात येणार असुन या योजनांचा लाभ दिव्यांगांना मिळवुन देण्यासाठी अर्जांची प्रतीपूर्ती करण्यात येणार आहे.या कार्यशाळेचे उद्घाटन तहसीलदार सारंग चव्हाण यांच्या हस्ते करण्यात येणार आहे तर प्रमुख पाहुणे म्हणुन विठ्ठल केदारे मुख्याधिकारी नगर परिषद, मधुकर कदम गट विकास अधिकारी, प्रदिप गायकवाड मुख्याध्यापक हे उपस्थित राहणार आहेत. या विविध तज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी दिव्यांगांनी आपले अपंगत्वाचे प्रमाणपत्र,आधार कार्ड,बैंक पासबुक व फोटो सोबत आणावेत व यात सहभागी होऊन सोनपेठ तालुक्यातील दिव्यांगांनी विविध शासकीय योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन सक्षमचे राकेश मेहता व हरीशचंद्र पांचाळ यांनी केले आहे.या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी संपर्क राकेश मेहता मो. ९०९६६९९६९६ हरीशचंद्र पांचाळ ९९७०९७३५१७ साधावा.

Thursday, November 17, 2022

पट्टाभिषेक वर्धापन दिनानिमित्त रुद्राभिषेक,दीपोत्सव,शोभायात्रा व सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान सोहळा प्रारंभ

पट्टाभिषेक वर्धापन दिनानिमित्त रुद्राभिषेक,दीपोत्सव,शोभायात्रा व सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान सोहळा प्रारंभ
    
सोनपेठ (दर्शन) :-

श्री नंदिकेश्वर भक्त मंडळी व समस्त वीरशैव व ग्रामस्थ मंडळ सोनपेठ आयोजित अखंड शिवनाम सप्ताह परमरहस्य पारायण शिवदिक्षा संस्कार दीपोत्सव व संगीतमय भजन श्री.ष.ब्र.गुरु १०८ श्री गुरु नंदकिशोर शिवाचार्य महाराज यांच्या बाविसाव्या पट्टाभिषेक वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त मान्यवर परमेश्वर लांडगे,केदारलींग स्वामी, महालिंग स्वामी, सुभाष नित्रुडकर, विनोद चिमणगुंडे, उमेश नित्रुडकर, माणिकआप्पा निलंगे, रामेश्वर महाजन, एन.व्हि. स्वामी, रमेश स्वामी, राधाकृष्ण हिक्के पाटील, नागनाथ सातभाई, विठ्ठल पुरबुज, मोहन खोडवे, रमेशशेठ झंवर, प्रा. विठ्ठल जायभाये, धुळाप्पा जमशेट्टे, नागनाथ कोटुळे, वैजनाथ चोंडे, उमाकांत कोल्हेकर,बसलिंग मोडीवाले, बालाजी कुंभार,रवी स्वामी,किरण स्वामी,नागेश स्वामी,रतीकांत स्वामी आदिंच्या हस्ते दीप प्रज्वलन,ध्वज पुजन,कलश पुजन,विना पुजन,ग्रंथ पुजन व मृदंग पुजन करुन या सोहळ्याचा प्रारंभ कार्तीक वद्य ८ आज दिनांक १७/११/२०२२ गुरुवार रोजी करण्यात आला तसेच मान्यवरांचे स्वागत श्री नंदिकेश्वर मठ संस्थान च्या वतीने करण्यात आले, प्रास्ताविक महालिंग मेहेत्रे यांनी केले तर प्रा.विठ्ठल जायेभाये यांनी मनोगत व्यक्त केले तसेच आशिर्वचन श्री गुरु ष.ब्र.१०८ नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज यांचे झाले व प्रारंभ करण्यात आला,या सोहळ्यासाठी प्रमुख उपस्थिती अनेक शिवाचार्य महाराजांची उपस्थिती लाभणार आहे.तसेच दि १७ पासुन दि.२३ पर्यंत अनेक शिवकिर्तनकार तर संगमेश्वर बिरादार वलांडीकर यांचे प्रसादाचे किर्तन होईल.दिनांक २१/११/२०२२ सोमवार रोजी सायंकाळी ६ ते ८ श्री गुरु ष.ब्र.१०८ नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज यांचा २२ वा पटाभिषेक वर्धापन दिन सोहळा तर २२ सामाजिक कार्यकर्ते यांचा सन्मान होईल,दिनांक २२/११/२०२२ शिवदीक्षा सकाळी १० ते १२, धर्मलिंगार्चनात्मक वीरशैव जंगम पुरोहित संस्था परभणी यांचे संजिवनी समाधीस रुद्राभिषेक सकाळी ८ ते १० वाजता, ग्रंथराज परम रहस्य व गुरुवर यांची शोभायात्रा भव्य दिव्य मिरवणूक दीपोत्सव सोहळा सायंकाळी ७ वाजता होईल.श्री नंदिकेश्वर मठ संस्थान सर्व ट्रस्ट सदस्य यांनी सोहळ्याचे साक्षीदार व्हा असे आवाहन केले आहे.

Wednesday, November 9, 2022

अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांचा उद्या जिल्हा दौरा

अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांचा उद्या जिल्हा दौरा

परभणी / सोनपेठ (दर्शन) :-

राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांचे उद्या गुरुवार, (दि. 10) रोजी सकाळी 7 वाजता परभणी येथे रेल्वेने आगमन होईल. त्यानंतर दुपारी 12 वाजेजर्यंत शासकीय विश्रामगृह येथे राखीव. दुपारी 1 वाजता स्थानिक कार्यक्रमास उपस्थित राहून हिंगोलीकडे प्रयाण करतील.

*****

Sunday, November 6, 2022

वीरशैव सिद्धयोगी मन्मथ स्वामी...

वीरशैव सिद्धयोगी मन्मथ स्वामी...  

सोनपेठ (दर्शन) :-

वीरशैव म्हणजे लिंगधारी शिवभक्त. पूर्वी यांना वीरमाहेश्वर म्हणत. ' सिद्धांतशिखामणी ' ग्रंथानुसार, ' विद्याया रमते यस्मान्मायां हेयां श्ववद रहेत | अनेनैव निरुक्तेन वीरमाहेश्वर: स्मृत: || ( ५.१७) अर्थ : शिवजीवैक्य विद्येमध्ये जे रममाण होतात आणि संसाररूपी मायेला श्वान समजून, तिचा त्याग करतात त्यांना ' वीरमाहेश्वर ' या अन्वर्थक नावाने संबोधिले जाते. 
शिवागमांमध्ये लिंगांगसामरस्यात रममाण होणाऱ्या शिवभक्तांना ' वीर ' म्हटले आहे. शिवयोग आणि ब्रह्मविद्या एकच आहे. याबाबत स्पष्टीकरण देतांना महासिद्ध रेणुकाचार्य म्हणतात, " वेदान्तजन्य यज्ञानं विद्येति परिकीर्त्यते |
विद्यायां रमते तस्यां वीर इत्यभिधीयते || ( सि. शि. ५.१८ ) 
अर्थ : उपनिषदांच्या अध्ययनाने प्राप्त होणाऱ्या शिवजीवैक्यबोधक ज्ञानाला विद्या असे म्हणतात व त्या विद्येत रमणाऱ्यांना वीर असे म्हणतात. यावरून वीरशैवांचा हा भक्तीयोग म्हणजे ' शिवाद्वैत वेदांत ' होय. 
* शिवयोगी रेवणसिद्ध परंपरा : 
शिवयोगी रेवणसिद्ध हे बसवपूर्व लिंगाधारी ( वीर ) शैवसिद्धांच्या मांदियाळीत मोडणारे उदारचरित सिद्ध होते.( डॉ. रा.चिं. ढेरे) , रेवणसिद्ध यांनी वीरशैव धर्मप्रसार केला. वीरशैव धर्मप्रसार केंद्र म्हणजे ' अनुभवमंडप ' . या संदर्भात लिं. डॉ. फ. गु. हळकट्टी म्हणतात, " ...रेवणसिद्धेश्वरांनी सोलापूरच्या पश्चिमेला ३० मैलांवरील ' मंगळवेढा ' येथे वीरशैव धर्मप्रसाराचे चौथे केंद्र निर्माण केले. कर्नाटकात संचार करणाऱ्या रेवणसिद्धांच्या प्रेरणेने बसवण्णांची विचारक्रांती होऊन राज्यात एक अद्भुत क्रांती निर्माण झाली आणि ' कल्याण ' हे पाचवे केंद्र निर्माण झाले. 
रेवणसिद्धांनी कर्मकांडविरहित अशा भावाधिष्ठित शिवभक्तीचा प्रसार केला. यांच्याकडून समतावादी व भक्तीमार्गाची प्रेरणा घेतलेल्या बसवेश्वरांची वैचारिक क्रांती झाल्याने, त्यांनी कल्याण येथे स्थापन केलेल्या अनुभव मंडपाने वर्णवर्चस्वाविरुद्ध अद्भुत क्रांती केली. या क्रांतीच्या परिणामस्वरूप तेराव्या शतकातील ज्ञानेश्वरादी संतांच्या विट्ठलभक्त - वारकरी संप्रदायाने देवाच्या दारातील समता स्वीकारलेली दिसून येते. 
* परमरहस्य शिवजीवैक्याचे : 
संत ज्ञानेश्वरकालीन शिवयोगी रेवणसिद्ध हे रंभापुरी वीरशैवपीठाचे जगद्गुरू यांना काडसिद्धेश्वर हे पर्यायनाम होते.  रेवगीरी जि. बीदर येथील . हे रेवणसिद्ध ' परमरहस्य ' या मूळ संस्कृतमधील ग्रंथाचे कर्ते आहेत. ( डॉ. पंडित आवळीकर, विवेकचिन्तामणी, प्रस्तावना) . रेवणसिद्ध - मरूळसिद्ध परंपरेतील रेवण ऊर्फ़ काडसिद्धेश्वर यांना गुरुस्थानी मानणारे व यांचा गाढ प्रभाव असणारे अनेक संप्रदाय आहेत. हे सर्व अद्वैत वेदांत मार्गाचे संप्रदाय आहेत. मुडलगी, चिम्मड, इंचगेरी इत्यादी यामध्ये नागेश संप्रदायाचाही समावेश होतो. 
नागेशांना परात्पर गुरुस्थानी मानणारे मन्मथस्वामी यांनी रेवणसिद्ध यांच्या ' परमरहस्य ' ग्रंथावरच मराठी टीका लिहिली आहे. शिवयोगी वडवळसिद्ध नागेश हे ' माणुरवासाय ' असून माणुरमठ हा रंभापुरी वीरसिंहासनपीठाचा शाखा मठ आहे. 
' परमरहस्य ' च्या शेवटी मन्मथशिवलिंग म्हणतात, 
' हा ग्रंथ स्वये ईश्वरमुखीचा | तोचि अवतार नागेश साचा | 
वीरशैव धर्म पाळावया | प्रकट कारविणार पै || 
तयाचे नामाभिधान | नागेशगुरु म्हणउन | 
प्रकट केले गुह्यज्ञान | लिंगधारी कळावया ||
यालागी शिव तोचि हा नागेश्वरु | परंपरेचि बसवराजगुरु | 
मानूरमठ सिंहासनाधिकारु | असे जाण जयाशी ||... 
परमगुरू नागेशांनीच हे गुह्यज्ञान लिंगधारी वीरशैवांसाठी प्रकट केले असून, त्याच परंपरेतील बसवराज गुरूंनी ही ' परमरहस्य ' टीका आपल्या कडून करवून घेतली असे स्पष्ट करतात. गुरु परंपरेतील एकात्मभाव प्रकट करतात. 
* उदारमतवादी वीरशैव : 
वीरशैव सिद्ध परंपरेतील शिवयोगी रेवणसिद्ध, मरूळसिद्ध, काडसिद्ध, सिद्ध नागेश यांच्या प्रमाणेच मन्मथस्वामींच्या शिष्य प्रभावळीतील संतकवींमध्ये लिंगेश्वर बार्शीकर, शिवदास बीडकर, सदाशिव नीनगूरकर, बसवलिंग, शिवलिंग, रामलिंग या वीरशैवांसह रामानंद मांजरसुंबेकर ( ब्राह्मण) , जीवनस्वामी ( मारवाडी) , मोहनदास ( धनगर) इत्यादी विविध जाती पंथाची शिष्यमंडळी आहेत.
सिद्ध नागेशांची दुसरी मिश्रपरंपरा असणाऱ्या अज्ञानसिद्ध शाखेतही सर्व जाती संप्रदायांच्या सत्पुरुषांचा समावेश आढळून येतो. शिखर शिंगणापूरचे शांतलिंगस्वामीही रेवणसिद्धांच्या शिष्यशाखेतले आहेत. ज्यांनी निजगुण  शिवयोगी यांच्या ' विवेकचिंतामणी ' ग्रंथाचा मराठी अनुवाद केला. हे समन्वयवादी म्हणून विख्यात आहेत. अशा वीरशैवांच्या उदारमतवादी परंपरेतील महासिद्धांचा उल्लेख करतांना सोळाव्या शतकातील शेख महमदाने ' महाआरतीत ' ' रवणमोराळसिध ' असा निर्देश केला आहे. मन्मथस्वामी याच परंपरेतील सिद्ध शिवयोगी आहेत. 
 " मन्मथ आलासे भूलोका | आता कोणी भिऊ नका |" अशा आत्मविश्वासाने त्यांनी तत्कालीन मराठी वीरशैवांमध्ये एक आत्मविश्वासपूर्ण चैतन्य निर्माण केले. परमरहस्य , गुरुगीता, ज्ञानबोध, अनुभवानंद इत्यादी काही प्रबोधनात्मक ग्रंथलेखन, अंभगादि स्फुट वाङ्ग्मय स्वतः निर्माण करून वीरशैव संतकवींची भक्कम फळी निर्माण केली. वीरशैवांचे सत्व, वीरत्व राखून अन्य मत - सांप्रदायिक शिष्यांना उदार मनस्कतेने जवळ केले. मन्मथस्वामींनी  शिवकीर्तनाची परंपरा पुनरुज्जीवित करून महाराष्ट्रातील वीरशैव धर्म परंपरेचे संरक्षण व संवर्धन केले आहे. या महत्कार्यामुळे मराठी वीरशैवांमध्ये मन्मथस्वामींचे स्थान अढळ असून तेच महाराष्ट्रातील वीरशैवांचे मानबिंदू आहेत. त्यांच्या महान कार्याला त्रिवार वंदन! 
@ श्री सिद्धमल्लय्या हिरेमठ, गुड्डापूर. ता. जत, जि. सांगली.

Saturday, November 5, 2022

आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांचा सोनपेठ येथे समाज प्रबोधनाच्या कार्यक्रमाचे साक्षीदार व्हा

आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांचा सोनपेठ येथे समाज प्रबोधनाच्या कार्यक्रमाचे साक्षीदार व्हा
सोनपेठ (दर्शन) :-

नगर परिषद सोनपेठ आयोजित स्वच्छ भारत अभियान २.० अंतर्गत "शहर स्वच्छता जनजागृती अभियान" निमित्त मा. श्री.भास्करराव पेरे पाटील (आदर्श सरपंच, ग्रामपंचायत पाटोदा, जि. औरंगाबाद) यांचा "समाज प्रबोधनाचा कार्यक्रमाचे" साक्षीदार व्हा.शुक्रवार दि.११ नोव्हेंबर २०२२ रोजी दुपारी १२ वाजता स्थळ छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक सभागृह नगर परिषद सोनपेठ ता.सोनपेठ जि.परभणी येथे आयोजित केला आहे.प्रमुख पाहुणे मा.श्रीमती आंचल गोयल जिल्हाधिकारी परभणी,प्रमुख उपस्थिती मा.श्री.सारंग चव्हाण तहसिलदार सोनपेठ,मा.श्री.एस.बी. धाबे गटविकास अधिकारी पं.स.सोनपेठ,मा.श्री. संदिप बोरकर सहाय्यक पोलीस निरीक्षक पो.स्टे. सोनपेठ,तरी सर्व नागरिकांनी,सर्व पक्षीय नेत्यांनी,सामाजिक कार्यकर्त्यांनी,पत्रकार बांधवांनी,तमाम महिलांनी,
विविध संघटना,सर्व बचत गट तसेच सर्व मित्र मंडळांनी,या प्रबोधन कार्यक्रमास उपस्थित रहावे अशी विनंती मा.श्री. विठ्ठल केदारे मुख्याधिकारी न.प.सोनपेठ.यांनी केली आहे.

Friday, November 4, 2022

सोनपेठचा भ्रष्टाचारी राक्षस ऊर्फ सोनपेठ चा दुर्भाग्य निर्माणकर्ता स्वतः च्या वाढदिवसाचा तमाशा दाखवतो तेव्हा ....

सोनपेठचा भ्रष्टाचारी राक्षस ऊर्फ सोनपेठ चा दुर्भाग्य निर्माणकर्ता स्वतः च्या वाढदिवसाचा तमाशा दाखवतो तेव्हा....


सोनपेठ (दर्शन) :-

सोनपेठचा भ्रष्टाचारी राक्षस ऊर्फ सोनपेठ चा दुर्भाग्य निर्माणकर्ता सोनपेठ शहरात दिनांक ४ नोव्हेंबर व दिनांक ५ नोव्हेंबर२०२२ असे दोन दिवस भ्रष्टाचारी राक्षस ऊर्फ सोनपेठ चा दुर्भाग्य निर्माणकर्ता स्वतः च्या वाढदिवसाचा तमाशा दाखवतो तेव्हा,यासाठी फार मोठा डाम डौल शहरात निर्माण केला आहे या वाढदिवसा वर स्वतः भ्रष्टाचारी राक्षस ऊर्फ सोनपेठ चा दुर्भाग्य निर्माणकर्ता यानेच लाखो रूपये खर्च केला आहे परंतू या वाढदिवसाचे कार्यक्रमाचे प्रायोजक हे वेगळे दाखविले आहेत म्हणून या वाढदिवसा वर झालेल्या खर्चाची आर्थिक गुन्हे विभाग यांचे कडून जिल्हाधिकारी परभणी यांनी चौकशी करावी व भ्रष्टाचारी राक्षस ऊर्फ दुर्भाग्य निर्माणकर्ता याचे वाढदिवसा वर खर्च केलेल्या लाखो रुपयांचे रकमेचे गौड बंगाल लोकांना कळले पाहिजे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा जिल्हा दक्षता नियंत्रण समिती सदस्य प्रभाकर शिरसाट यांनी व्यक्त केली आहे.सोनपेठ येथे नगर परिषदेची दोन व खाजगी एक सभागृहे अशी तीन सभागृहे सोनपेठ शहरात असताना आठवडी बाजारातील लहान व्यापाऱ्यांचे विविध स्टॉल्स व हातगाडे जबरदस्तीने हटवून त्या ठिकाणी हा वाढदिवसाचा कार्यक्रम होत आहे हा अट्टाहास कशा साठी केला जात आहे तर भ्रष्टाचारातून मिळविलेल्या संपत्तीचा देखावा भर बाजारात दाखविण्या साठी केले जात आहे.हे जनतेला वेगळे सांगण्याची गरज नाही या जागेचे भाडे नगर परिषदेला दिले नाही ही जागा वापरण्यासाठी नगर परिषदे कडून नियमा प्रमाणे परवानगी घेतली नाही मग नगर परिषद कर्मचाऱ्यांनी कुणाचे आदेशावरून ही स्टॉल्स व हातगाडे जबरदस्तीने हटविले आहेत याची चौकशी झाली पाहिजे.या कार्यक्रमा साठी अनधिकृत पने चोरून वीज वापरली जात होती याची तक्रार होवून चोकशी होईल म्हणून सायंकाळी वीज जोडणी करून वेळ निभावून नेली आहे.या वाढ दिवसाचे कार्यक्रमाचे डिजिटल बॅनर शॉपिंग कॉम्प्ले्स वर नगर परिषदेला भाडे न देता व नगर परिषदेची परवानगी न घेताच लावले आहेत याची चौकशी झाली पाहिजे.या कार्यक्रमा साठी पोलीस स्टेशनचा वाद्य पास परवाना घेतला का ? कारण वाद्य संगीत आणि लाऊडस्पिकर रात्री १० वाजल्यानंतर ही वाजविले आहे.
या वाढदिवसा साठी मध्यरात्री मोठया मोठया आवाजाचे फटाके वाजवून आतिश बाजी करण्यात येते परंतु या साठी जिल्हादंडाधिकारी परभणी यांची रीतसर परवानगी घेतलेली नाही याची चौकशी झाली पाहिजे.या  वाढदिवसाचे कार्यक्रमा मुळे आठवडी बाजारा मध्ये पादचारी लोक व वाहन धारक यांचे रस्ते बंद केल्या मुळे अनेकांची गैर सोय झाल्यामुळे तारांबळ उडाली आहे.आठवडी बाजारातील हातावर पोट असणारे व्यापारी  व हातगाडे वाले यांना जबरदस्तीने दोन दिवसा साठी इतरत्र हटविल्या मुळे या हात गाडे वाले व व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे 
या शिवाय आगामी काळा मध्ये यांच्या धंद्याला फटका बसणार आहे तो वेगळाच या साठी जबाबदार कोण ? याची चौकशी झाली पाहिजे.ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकरी अगदी मेटाकुटीला आला आहे अशा दुःखी व वेदनामय परिस्थिती मध्ये भ्रष्टाचारी राक्षस उर्फ सोनपेठचा दुर्भाग्य निर्माणकर्ता वाढदिवस साजरा करून आसुरी आनंद घेत आहे. सोनपेठ शहराला गेल्या वीस वर्षांपासून शुध्द व स्वच्छ पाणी पुरवठा भ्रष्टाचारी राक्षस उर्फ सोनपेठचा दुर्भाग्य निर्माणकर्ता पुरवठा करू शकला नाही गेल्या वीस वर्षांत या भ्रष्टाचारी राक्षस ऊर्फ सोनपेठचा दुर्भाग्य निर्माणकर्ता याने सोनपेठ नगर परिषदे मध्ये भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार करून कोट्यावधी रुपयांची संपती मिळविली आहे व ही भ्रष्टाचारातून मिळविलेली संपती त्याला गप्प बसू देत नाही म्हणून भ्रष्टाचारी राक्षस ऊर्फ सोनपेठ चा दुर्भाग्य निर्माणकर्ता हा आयोजक दाखवून स्वतः वाढ दिवस साजरा करीत आहे.भ्रष्टाचारी राक्षस उर्फ सोनपेठचा दुर्भाग्य निर्माणकर्ता म्हणतो मला पहा अन् फुलं वाहा,भ्रष्टाचारी राक्षस ऊर्फ दुर्भाग्य निर्माणकर्ता हा काही आमदार खासदार यांचे दर्जाचा नाही म्हणून त्याचा वाढदिवस कोणी ही मनातून साजरा करीत नाहीत म्हणून हा लोकांना पैसे देवून व आयोजक दाखवून स्वतः चा वाढदिवस स्वतःचे पैशातून साजरा करतो जनता आता भ्रष्टाचारी राक्षस ऊर्फ सोनपेठचा दुर्भाग्य निर्माणकर्ता याचा वाढदिवस स्वतःचे पैशातून साजरा करायला दूध खुळी राहिली नाही हे जनतेला वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही .भ्रष्टाचारी राक्षसाला ऊर्फ दुर्भाग्य निर्माणकर्ता याला श्रीमंतीचे प्रदर्शन करण्याची खूप हौस आहे म्हणुन हा वाढदिवसाचा खटाटोप आहे.दिनांक ४ व ५ नोव्हेंबर 2022 रोजी शिर्डी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अभ्यास शिबीर चालू आहे त्या अभ्यास शिबिराला न जाता भ्रष्टाचारी राक्षस ऊर्फ सोनपेठ चा दुर्भाग्य निर्माणकर्ता सोनपेठ येथे वाढदिवस साजरा करण्यात मश्गूल झाला आहे याला कोणता अभ्यास येत नसल्यामुळे तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अभ्यास शिबिराला गेला नाही हे स्पष्ट आहे 
सोनपेठचा भ्रष्टाचारी राक्षस ऊर्फ सोनपेठ चा दुर्भाग्य निर्माणकर्ता यांचे कार्यकाळात सोनपेठ शहारा मध्ये अनेक ठिकाणी नाल्यांची साफ सफाई होत नव्हती मलनिःसारण योग्य रीतीने होत नव्हते म्हणूनच गेल्या ऐन दिवाळीत काबरा मार्केट येथे नाली ब्लॉक झाल्यामुळे बस स्टँड भागात लोकांना चालता येत नव्हते फिरता येत नव्हते जवळ पास 25 दिवस या रस्त्यावर दुर्गंधी पसरली होती हे सर्व भ्रष्टाचारी राक्षस ऊर्फ सोनपेठचा दुर्भाग्य निर्माणकर्ता याचे मुळे झाले आहे हे सर्व शहर वासियाना माहीत आहे 
सोनपेठ शहरामध्ये गल्ली बोळा मध्ये वावरणाऱ्याला सोनपेठचा भ्रष्टाचारी राक्षस ऊर्फ सोनपेठचा दुर्भाग्य निर्माणकर्ता या  शिवाय दूसरी कोणती ही उपाधी शोभून दिसणार  नाही किती रोजंदारी कर्मचारी बरबाद केले किती कंत्राटदार बरबाद केले किती व्यापारी बरबाद केले किती कार्यकर्ते बरबाद केले किती नगर सेवक बरबाद केले किती मिस्त्री बरबाद केले किती युवक बरबाद केले याची मोजदाद आहे काय ? याचा काही हिशेब नाही, गेल्या वीस वर्षा मध्ये स्वतः शिवाय कोणी ही आर्थिदृष्टया सक्षम होवू नये या साठी आवश्यक ती दक्षता घेतली आहे व वापर मात्र सर्व पक्षांचा सर्व नेत्यांचा व सर्व कार्यकर्त्यांचा केला आहे
परंतू एवढे मात्र सत्य आहे की भ्रष्टाचारी राक्षस उर्फ सोनपेठ चा दुर्भाग्य निर्माणकर्ता याचे मागे आता पूर्वी इतके जन समर्थन राहिले नाही लोकांनी त्याला पुर्ण पने ओळखले आहे तो काही ही सोंगे ढोंगे करून लोकांची दिशाभुल करून सोनपेठ नगर परिषद मध्ये बेकायदेशीर व नियमबाह्य कामे करून शहर लुटणार आहे म्हणून तो जनतेच्या मनातून उठला आहे.सदरचा वाढदिवस हा सर्व सामान्य लोकांचा कार्यक्रम नसून केवळ भ्रष्टाचारी राक्षस ऊर्फ सोनपेठचा दुर्भाग्य निर्माणकर्ता याचे स्तोम माजविणारा असुन त्याचा उदो उदो करणारा आहे
परंतू आता काही ही केल्याने काहीच फरक पडणार नाही म्हणतात ना बुंदसे गई हौद से नहीं आती हे सत्य आहे 
भ्रष्टाचार करणे आणि स्वतःची तुमडी भरणे हाच त्याचा धंदा झाला आहे म्हणून येणाऱ्या निवडणूकीत जनता त्याला मत पेटी द्वारे पायदळी तुडविणार आहे हे निश्चित आहे.असे रोखठोक मत सामाजिक कार्यकर्ते तथा जिल्हा दक्षता नियंत्रण समिती सदस्य प्रभाकर शिरसाट यांनी व्यक्त केले आहे.

Saturday, October 29, 2022

व्यापारी बांधवांनी लोकसहभागातून आपल्या दुकानाच्या बाहेर ही सिसीटिव्हि कॕमेरे बसवावेत - सपोनी संदिप बोरकर

व्यापारी बांधवांनी लोकसहभागातून आपल्या दुकानाच्या बाहेर ही सिसीटिव्हि कॕमेरे बसवावेत - सपोनी संदिप बोरकर 
सोनपेठ (दर्शन) :-

परभणी जिल्ह्यात होत असलेल्या घरफोडी व चोरीच्या अनुषंगाने सोनपेठ शहरातील सर्व प्रतिष्ठित व्यापारी नागरिक यांची पोलीस ठाणे येथे दि.29 आक्टोबर शनिवार रोजी मीटिंग घेऊन चर्चा केली त्यावेळी सोनपेठ शहरातील प्रमुख ठिकाणी 20 सीसीटीव्ही कॅमेरे लोकसहभागातून बसवण्याबद्दल नियोजन केले आहे तसेच आमच्या आव्हानानंतर सराफा असोसिएशन ने शटरला सायरन बसविलेले आहेत इतर दुकानांना पण बसविण्याबद्दल चर्चा करून बसविण्याची कारवाई करत असल्याची माहिती सपोनी संदिप बोरकर यांनी दिली.तसेच व्यापारी बांधवांनी लोकसहभागातून आपल्या दुकानाच्या बाहेर ही सिसीटिव्हि कॕमेरे बसवावेत व पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले.व्यापारी महासंघ अध्यक्ष कृष्णा कुसुमकर, केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोशीऐशन अध्यक्ष सुरेश लोढा,सराफा असोशीऐशन अध्यक्ष विष्णूपंत दिहिवाळ, व्यापारी महासंघाचे सचिव आश्रोबा खरात पाटील यांच्या सह अनेक असोशिऐशन चे पदाधिकारी व पत्रकार बांधव उपस्थित होते.याप्रसंगी पोलीस निरीक्षक, अंमलदार, पोलीस हेडकॉन्स्टेबल व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

विमा कंपन्यांची तालुकास्तरीय कार्यालये तातडीने सुरु ; कृषि मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले होते आदेश विमा,महसूल व तालुका कृषि अधिका-यांचे संपर्क क्रमांक जाहीर

विमा कंपन्यांची तालुकास्तरीय कार्यालये तातडीने सुरु ; कृषि मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले होते आदेश
विमा,महसूल व तालुका कृषि अधिका-यांचे संपर्क क्रमांक जाहीर
परभणी / सोनपेठ (दर्शन) : -

कृषि मंत्री अब्दुल सत्तार हे परभणी जिल्हा दौ-यावर आले असता  जिंतूर तालुक्यात शेतक-यांनी विमा कंपनी प्रतिनिधींकडून देण्यात येणा-या वागणुकीबाबत तक्रारी केल्या होत्या. त्यावर कृषि मंत्री श्री. सत्तार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतलेल्या बैठकीत विमा कंपनी प्रतिनिधी, महसूल विभागाचे अधिकारी आणि तालुका कृषि अधिकारी यांनी समन्वय ठेवत शेतक-यांच्या अडचणी तातडीने सोडविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार प्रभारी जिल्हाधिकारी राजेश काटकर यांनी संबंधित तालुकास्तरीय अधिका-यांचे संपर्क क्रमांक जाहीर केलेले आहेत.
 
जिल्ह्यातील शेतक-यांना आता पिक विम्याबाबत येणा-या अडचणी तात्काळ सोडविल्या जाणार आहेत. कृषिमंत्र्यांच्या आदेशानुसार जिल्हा प्रतिनिधीने प्रत्येक तालुकास्तरावरील कार्यालये तात्काळ सुरु केली आहेत. यामुळे शेतक-यांना दिलासा मिळणार आहे. 

कृषि मंत्री श्री. सत्तार यांच्या दौ-यादरम्यान जिंतूर तालुक्यात पिक विमा कार्यालय बंद असल्याचे निदर्शनास आले होते. त्याचबरोबर जिल्हाभरात पिक विमा कंपनीची सर्व कार्यालये बंद असल्याचे शेतक-यांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिले होते. पिकविमा कंपनीचे कर्मचारी कार्यालयीन वेळेत कार्यालयात उपस्थित नसणे, शेतक-यांचा समक्ष व भ्रमणध्वनीवरून संबंधित कर्मचा-याचा फोनवर संपर्क न होणे, तसेच प्रत्यक्ष भेटी न घेणे, शेतक-यांच्या विमाविषयक तक्रारीचा तातडीने निपटारा न करणे अशा स्वरुपाच्या तक्रारी शेतक-यांनी केल्या होत्या.  त्याबाबत मंत्र्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत बैठकीला उपस्थित असलेल्या जिल्हा प्रतिनिधीला तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

त्या अनुषंगाने पिक विमासंबंधित कंपनीचे अधिकारी-कर्मचारी यांच्याशी संपर्क करून तक्रारींचा निपटारा करण्यासाठी पिक विमा कंपनी, तालुका कृषी अधिकारी कार्यालय, नायब तहसीलदार यांचे संपर्क क्रमांक जाहीर केले आहेत.

विमा कंपनीचे जिल्हा समन्वयक किशोर वळसे (7208912084) आणि संतोष अशोकराव बेद्रे,  (7028213555), तर तालुका समन्वयक अर्जुन हरीभाऊ मोरे गंगाखेड (9767462257), आकाश हरिभाऊ अंबलिगे जिंतूर (9588482709)  शुभम रमेश कावळे, मानवत (9545995442), राजू लक्ष्मणराव खुळे, पालम  (9766030170),केशव ग्यानदेव शेळके, परभणी (9503493655), सतीश शुभाषराव बेद्रे, पूर्णा (9370199847), विनोद देवराव झाडे, सेलू (8830411415), आकाश राजाभाऊ मोरे, सोनपेठ (9146920614), सुरज ज्ञानोबा लाटे, पाथरी (8446342191) हे  विमा कंपनीचे प्रतिनिधी आहेत.

नित्यानंद मुंजाजी काळे, तालुका कृषी अधिकारी, परभणी (9767007688), आर. एच. तांबीले, पुर्णा (7218654769), जी. ए. कोरेवाड, सोनपेठ (9423173366), ए.जे. देशमुख, पालम (7057232305), पी.बी. बनसावडे, गंगाखेड (7588571115), एस.पी.काळे, जिंतूर (9422725727),पी. एस. नांदे, पाथरी (9423442160), डी.टी. सामाले, सेलू (9423774133) आणि पी. एच. कच्छवे, मानवत (9096595997) यांचा समावेश आहे.

एल. व्ही. खळीकर, नायब तहसिलदार, परभणी (8329150935), के. व्ही. मस्के, पूर्णा (8390247049), प्रकाश गायकवाड, सोनपेठ  (8208967814), आर. एन. पवळे, पालम, (8698184177), सुनिल कांबळे, गंगाखेड  (9049880750), ओमप्रकाश गौंड,जिंतूर (7276993051), संदीप साखरे, पाथरी (7720972431), प्रशांत थारकर,सेलू (9588607076), बी. आर. वटाणे, मानवत (8830650810) आणि परभणी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्रमांक 02452-226400 आहे. शेतक-यांना पिक विम्याशी संबंधित अडचणी आल्यास वरील विमा कंपनी प्रतिनिधी,तालुका कृषि अधिकारी आणि नायब तहसीलदार यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राजेश काटकर यांनी केले आहे.

Friday, October 21, 2022

प्रा.कालिदास कुलकर्णी यांची पुस्तकं लिखाण कार्याबद्दल राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड

प्रा.कालिदास कुलकर्णी यांची पुस्तकं लिखाण कार्याबद्दल राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड

 
               सोनपेठ (दर्शन) :-

सोनपेठ येथील श्री महालिंगेश्वर कनिष्ठ महाविद्यालयातील प्रा.कालिदास रामकृष्ण कुलकर्णी यांची महात्मा फुले शिक्षक परिषद महाराष्ट्र यांच्या वतीने दिल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड झाली आहे. प्रा.कालिदास कुलकर्णी हे श्री महालिंगेश्वर कनिष्ठ महाविद्यालय सोनपेठ येथे सण 1994 पासून एम.सी.व्ही.सी.विभागात कार्यरत आहेत ते एक उत्कृष्ट अध्यापक असून मनमिळावू,विद्यार्थी प्रिय,समाजकार्यात अग्रेसर असणारे,नेहमीच मदतीचे हात सदैव पुढे असणारे, प्रा.कालिदास कुलकर्णी हे सर्वांना परिचित आहेत.ते त्यांच्या उत्कृष्ट सामाजिक,शैक्षणिक कार्यातून जाणवते. वाचनाची आवड,सामाजिक कार्याची आवड,त्याचबरोबर सांस्कृतिक वारसा असलेले प्रा.कालिदास कुलकर्णी हे महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या अंतर्गत "इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी" या अभ्यासक्रमाचे पुस्तक लेखनाचे काम त्यांनी केलेले आहे. विशेष या कार्याची दखल घेऊन महात्मा फुले शिक्षक परिषद महाराष्ट्र राज्य यांनी त्यांची राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड केली आहे.प्रा.कालिदास कुलकर्णी यांना नुकतेच पुरस्कार निवडीचे पत्र प्रदेश अध्यक्ष श्री व्यंकटराव जाधव,परभणीचे जिल्हाध्यक्ष प्रा.गोविंद लहाने,उपाध्यक्ष प्रा.सिद्धार्थ सोनाळे यांच्या हस्ते देण्यात आले.महात्मा फुले शिक्षक परिषद महाराष्ट्र यांच्या वतीने आयोजित केलेल्या शिक्षण परिषद व पुरस्कार वितरण सोहळा कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर येथे दिनांक 30 ऑक्टोबर 2022 ला मान्यवरांच्या हस्ते हा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार दिला जाणार आहे त्यांच्या या निवडीबद्दल श्री महालिंगेश्वर माध्यमिक उच्च माध्यमिक व्यावसायिक अभ्यासक्रम यांच्या वतीने तसेच श्री महालिंगेश्वर विद्यालय अध्यक्ष ष.ब्र.108 चन्नबसव शिवाचार्य महाराज, सचिव सुभाषआप्पा नित्रुडकर, संस्था सदस्य,सा.सोनपेठ दर्शन परिवार, विद्यार्थी, पत्रकार, मित्र परिवार व सर्वस्तरातून अभिनंदन होताना दिसत आहे.

परभणी आगार प्रमुखाचा मनमानी कारभार ; दीपावलीच्या सणासुदीत महिलांची हेळसांड

परभणी आगार प्रमुखाचा मनमानी कारभार ; दीपावलीच्या सणासुदीत महिलांची हेळसांड



सोनपेठ (दर्शन) :-
सोनपेठ पोखर्णी शिर्शी मार्गे सोनपेठ बस तासा तासाला सुरु असताना दिपावली सारख्या सनाला बस असताना रद्द करणे,दोन तासांनी बस सोडणे, सोनपेठ पर्यंत बस न सोडता शिर्शी पर्यंत सोडणे,अशा पद्धतीने परभणी आगार प्रमुखाचा मनमानी कारभार वाढलेला दिसून येत आहे, ट्रॅव्हल्स वाल्यांची हफ्ते खोरी दीपावली सारख्या सणाला रंग आणत आहे ? अशी चर्चा होताना दिसत आहे, माननीय मुख्यमंत्री तथा परिवहन मंत्री परभणी आगार प्रमुखाकडे लक्ष द्या अशी मागणी सर्वसामान्य जनतेतून होताना दिसत आहे, झोपेचं सोंग केलेल्या आगर प्रमुखाला उठवणार कोण ? असाही सवाल सर्वसामान्य जनतेतून पडलेला दिसून येत आहे, सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी, कामगार हा दीपावलीच्या सणासाठी ट्रॅव्हल्स चे भाडे भरू शकत नाही त्याला एकमेव पर्याय बसचा असून बसचा असा तुघलगी कारभार पाहता शिर्शी पर्यंत आलेल्या बसमधून महिलांची हेळसांड झालेली दिसून येत आहे. लवकरात लवकर परभणी आगार प्रमुखांना सूचना देऊन ज्या ठिकाणी अर्ध्या तासाला शटल सेवा आहे त्या ठिकाणच्या गाड्या इतरत्र वळत्या करून इतर मार्गावर धावाव्यात अशी सूचना करावी अशी जनतेतून मागणी होताना दिसत आहे.

Thursday, October 20, 2022

दिवाळी सण - एक आध्यात्मिक संदेश.... गुरुदेव श्री आशुतोष महाराज जी,संस्थापक एवं संचालक, दिव्य ज्योति जाग्रति संस्थान.

दिवाळी सण - एक आध्यात्मिक संदेश....
गुरुदेव श्री आशुतोष महाराज जी,संस्थापक एवं संचालक, दिव्य ज्योति जाग्रति संस्थान.
सोनपेठ (दर्शन) :-

            सूर्योदयापासून सुरू होणारा प्रत्येक दिवस मानवी सभ्यतेच्या महान गाथेतील एक सुवर्ण अध्याय म्हणून येतो. पण काही दिवस आपल्यातच इतके महत्त्वाचे संदेश घेऊन येतात की मानव समाज त्यांना युगानुयुगे विसरू शकत नाही. असे अविस्मरणीय दिवस सण किंवा उत्सव म्हणून साजरे केले जातात. विशेषत: सणांच्या संदर्भात भारत हा सर्वात समृद्ध देश आहे. सण हे भारतीय संस्कृतीचे प्राण आहेत. ते जीवनावश्यक आणि पौष्टिक आहेत. कारण भारतीय सणांमध्ये ती ऊर्जा आहे, ज्यामध्ये कर्मकांडापासून वंचित राहिलेल्या मानव जातीला पुन्हा जिवंत करण्याची क्षमता ठेवते.
             कार्तिक महिन्याच्या अमावस्येला साजरा केला जाणारा  'दीपावली उत्सव'या सांस्कृतिक उत्सवांच्या मालिकेत, मुकुटमणी स्थानावर आहे. या उत्सवाच्या नावावरूनच त्याचे तेज आणि दिव्यता दिसून येते. 'दीप' म्हणजे दिवा, 'अवली' म्हणजे पंक्ती. म्हणजेच दिव्यांची पंक्ती. या सणाच्या दिवशी, लखलखणारे दिवे एकच संदेश देतात – तुमच्या अंतरंगातील तमोगुण दूर करा. मिणमिणते दिवे आपल्याला अंतर्मनात ईश्वर-ज्ञानाचा प्रकाश प्रज्वलित करण्यास सांगतात, अमावस्या कितीही अंधारलेली असो, अंतरंगात आमच्यासारखे प्रकाशमान व्हा.
             हा उत्सव भव्यतेचा उत्सव नाही. तो महान संदेशांचा वाहक आहे. दीपावली साजरी करण्यामागचे सर्वात लोकप्रिय कारण पाहिल्यास, आपल्या लक्षात येईल की हा मुख्यतः श्री राम-सीता अयोध्येत परतल्याचा आनंदाचा उत्सव आहे. त्रेतायुगातील हा संपूर्ण प्रसंग एक अलौकिक संदेश देऊन जातो. अध्यात्मिक दृष्टिकोनानुसार सीता हे आत्म्याचे प्रतीक आहे. मनाच्या रूपात रावणाचे शरीर म्हणून तो लंकेत कैद आहे. मनातील इच्छा आणि विकार हे आसुरी शक्तींचे प्रतीक आहेत. नाना प्रकारच्या यातना आणि प्रलोभने देऊन ते आत्म्याला सतत त्रास देत आहेत. अशा स्थितीत श्री हनुमान रामदूत म्हणून अशोक वाटिकेत पोहोचले, अशी महती आहे. हरणाच्या वेळी रावणाचा ऋषी वेश पाहून सीताजींची एकदा फसवणूक झाली होती. त्यामुळेच यावेळी त्यांचा हनुमानजींवर विश्वास बसला नाही. त्यांनी रामदूत असल्याचा पुरावा मागितला. हनुमानजींनी त्यांच्यासमोर भगवान श्रीरामाची मुहर पुरावा म्हणून मांडली. या रिंगणात सीताजींना रामाचे प्रत्यक्ष दर्शन झाले. हे पाहूनच त्यांनी हनुमानजींना रामाचे दूत म्हणून स्वीकारले. परमेश्वराच्या अलौकिक दर्शनाने निराश झालेल्या सीतेच्या मनात अढळ विश्वास निर्माण केला की तिला लवकरच परमेश्वराच्या भेटीचा आनंद मिळेल. हीच श्रद्धा, हे आश्वासन प्रत्येक युगात, प्रत्येक जीवाला स्वतःसाठी हवे असते. रामदूत हनुमान हे परिपूर्ण सतगुरूचे प्रतीक आहे. आपल्या आत्म्यालाही अशा सत्गुरूची नितांत गरज आहे, जेणेकरून मनाच्या रूपाने रावणाच्या राजवटीतून मुक्त व्हावे.
           ही कथा आणखी एका महत्त्वाच्या सत्यावर प्रकाश टाकते. सध्या सर्वत्र भगवे कपडे घातलेले प्रचारक दिसत आहेत. अशा स्थितीत सीताजींप्रमाणेच प्रत्येक साधकाला आपल्या सिद्धतेचा पुरावा त्यांच्याकडून मागावा लागतो. जे परिपूर्ण गुरू आहेत, ते ब्रह्मज्ञानाचा शिक्का पुरावा म्हणून देतील. या ज्ञानाद्वारे शिष्याला त्याच्या आत असलेल्या परम प्रकाशाचे (श्री राम) प्रत्यक्ष दर्शन होईल. किंबहुना हाच गुरूंच्या सत्यनिष्ठेचा पुरावा आहे. मग ज्याप्रमाणे सीताजींना आपल्या मुक्तीची पूर्ण खात्री झाली होती, त्याचप्रमाणे खर्‍या गुरूंच्या मार्गदर्शनाखाली शिष्याला पूर्ण खात्री होते. त्याच्याकडून भगवंताचे दर्शन घेतल्यानंतर तोही मुक्तीच्या मार्गावर पूर्ण श्रद्धेने आणि भगवंताशी एकरूप होऊन पुढे जातो आणि निःसंशयपणे गंतव्यस्थान प्राप्त करतो. परिपूर्ण सतगुरूच्या सान्निध्यात, शिष्य स्वतःमध्ये अलौकिक दीपावली साजरी करतो. सत्गुरूंच्या कृपेने त्यांचे हृदय दिव्य दिव्यांनी, असंख्य दीपशिखांनी आणि सोनेरी प्रकाशाने भरलेले असते आणि हेच या प्रकाशोत्सवाचे सार्थक रूप आहे. दिव्य ज्योती जागृति संस्थेतर्फे सर्व वाचकांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.

Monday, October 17, 2022

गुरुवर्य बाबुदेव महाराज जोशी (बप्पा) यांच्या ९ व्या पुण्यतिथी निमित्त अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ

गुरुवर्य बाबुदेव महाराज जोशी (बप्पा) यांच्या ९ व्या पुण्यतिथी निमित्त अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ

सोनपेठ (दर्शन) :-

सोनपेठ शहरातील पोथीचा वाडा येथे वे.शा.सं.वै. गुरुवर्य बाबुदेव महाराज जोशी (बाप्पा) यांच्या ९ व्या पुण्यतिथी निमित्त दि. १६ ऑक्टोबर रोजी अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा व कीर्तनास प्रारंभ करण्यात आला आहे. 
वे.शा.सं.वै. गुरुवर्य बाबुदेव महाराज जोशी (बाप्पा) यांच्या ९ व्या पुण्यतिथी निमित्त शहरातील पोथीचा वाडा येथे अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा व कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. यात पहाटे ४ ते ६ काकडा आरती, सकाळी ६ ते १० ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी २ ते सायं. ५ श्रीमद् भागवत कथा, सायं. ६ ते ७ हरिपाठ, रात्री ९ ते ११ हरिकिर्तन व नंतर जागर होणार आहे. भागवत प्रवक्ते ह.भ.प.श्री.भागवतरसिक माधव महाराज कुरे सोनपेठकर यांच्या मुखातून श्रीमद् भागवत कथेचे श्रवण होणार आहे.तसेच दि.१६ ऑक्टोबर रविवार रोजी श्री.ह.भ.प. अमोल महाराज गोरे किर्तन झाले, दि. १७ रोजी श्री.ह.भ.प. वैजनाथ महाराज मुळे धामोणी यांचे किर्तन झाले तर आज दि. १८ रोजी श्री.ह.भ.प. पारसमल महाराज ललवाणी सिरसाळा, दि. १९ रोजी श्री.ह.भ.प.प्रशांत महाराज तोरे लातूर, दि. २० रोजी श्री.ह.भ.प. नामदेव महाराज फपाळ, दि. २१ रोजी श्री.ह.भ.प.सोमनाथ महाराज बदाले, दि २२ रोजी श्री.ह.भ.प.माधव महाराज कुरे आदिंचे किर्तन होणार आहे तर दि २३ रोजी सकाळी ११ ते १ श्री.ह.भ.प.शरद महाराज आंबेकर यांचे काल्याचे किर्तन होईल व नंतर महाप्रसादाने सप्ताहाची सांगता होइल.तरी सर्व भाविकांनी भागवत कथा, कीर्तन श्रवणाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आव्हान आयोजक समस्त भक्त मंडळी सोनपेठ यांनी केले आहे.

Sunday, October 16, 2022

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या तालुका कार्याध्यक्ष पदी कुलदीप भोसले यांची नियुक्ती

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या तालुका कार्याध्यक्ष पदी कुलदीप भोसले यांची नियुक्ती

सोनपेठ (दर्शन) :-
सोनपेठ तालुक्यात नियोजित शरद युवा संवाद यात्रे निमित्ताने राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांच्या हस्ते राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या सोनपेठ तालुका कार्याध्यक्ष पदी कुलदीप भोसले यांची नियुक्तीपत्र देऊन करण्यात आली आहे.कुलदीप भोसले यांनी गेल्या १०-१२ वर्ष राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस मध्ये काम केले.पक्षाने पुन्हा दखल घेत त्यांना संधी दिली आहे.याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख,चंदन पाटील नगराळकर, राजेश विटेकर,परभणी जिल्ह्याचे युवक राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष रितेश काळे,माजी नगरसेवक ॲड.श्रीकांत विटेकर,अब्दुल रहेमान सौदागर आदीसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका व शहर पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या सह सर्व स्तरातून अभिनंदन होताना दिसत आहे.

Saturday, October 15, 2022

प्रा.सिद्धार्थ आबाजी तायडे यांना नाट्यशास्त्र विषयात पीएच.डी.प्रदान

प्रा.सिद्धार्थ आबाजी तायडे यांना नाट्यशास्त्र विषयात  पीएच.डी.प्रदान

परळी / सोनपेठ (दर्शन) :-

 प्रख्यात सिने-नाटय लेखक-दिग्दर्शक-अभिनेता-समीक्षक व संशोधक प्रा. डॉ. सिद्धार्थ तायडे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद यांच्या वतीने आंतरविद्या शाखाअंतर्गत नाट्यशास्त्र विषयात पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ,नाट्यशास्त्र विभागातील संशोधन मार्गदर्शक डॉ. अशोक बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली 'मराठी दलित रंगभूमीचा चिकित्सक अभ्यास' या विषयात त्यांनी संशोधन केले आहे . मुंबई विद्यापीठ लोककला अकादमीचे  विभाग प्रमुख प्रा. डॉ. गणेश चंदनशिवे बहिस्थ परीक्षक म्हणून उपस्थित होते तर  डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नाट्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. स्मिता साबळे अध्यक्ष म्हणून उपस्थित होत्या.
या यशाबद्दल स्वामी रामानंद शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष व माजी आमदार शिवाजीराव चोथे, संत रामदास महाविद्यालय घनसावंगीचे प्राचार्य डॉ.आर. के. परदेशी,कोषाध्यक्ष डॉ. संभाजी चोथे,सचिव श्री.विनायक चोथे, उपप्राचार्य प्रा. प्रमोद जायभाये,कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. भगवान मिरकड, डॉ. राजू सोनवणे, गोरख चोथे, आंतर विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. चेतना सोनकांबळे,प्रा. दत्ता भगत, प्रेमानंद गज्वी,बलभीम तरकसे,प्रोफेसर डॉ. संजय जाधव,प्रा. गौतम गायकवाड,प्राचार्य डॉ. कमलाकर कांबळे,प्राचार्य डॉ. दादाहरी कांबळे,डॉ. दिनेश मोरे,डॉ. सतीश साळुंके, प्रकाश त्रिभुवन, डॉ. ऋषिकेश कांबळे,डॉ. प्रवीण भोळे,
डॉ. सतीश पावडे, डॉ. संजय पाटील,डॉ. मंगेश बनसोड,प्रा. किशोर शिरसाठ,डॉ. देवदत्त म्हात्रे, डॉ.जितेंद्र पानपाटील, राजकिशोर मोदी,डॉ. संपदा कुलकर्णी,प्रा. दीपक गरुड, डॉ. विलासराज भद्रे,डॉ.अनिलकुमार साळवे,डॉ. संजीवनी साळवे,सिल्व्हर ओक फिल्म अँड एंटरटेनमेंटचे निर्माता मनोज कदम,अमृत मराठे,महादेव किरवले, रवींद्र जोगदंड,राजकुमार तांगडे,डॉ. वैशाली बोदेले,प्रा. गजानन दांडगे,डॉ. केदार काळवणे,प्रा. प्रशांत भोले,नाथराव वाव्हळ, विष्णू तायडे,भगवान जगताप, अविनाश वाव्हळ, अजय जगताप,
आबासाहेब वाघमारे,प्रा.एस. एल. देशमुख,विजय जाधव,प्रा. दासू वाघमारे, प्रा. रघुनंदन खरात, अरुण सरवदे,डॉ.  धनंजय वडमारे,डॉ. ज्ञानेश्वर सोनवणे,प्रा. रमेश धोंडगे,डॉ. संजय पाईकराव,डॉ सचिन बनसोडे,प्रा. अर्जुन पाटेकर,डॉ. हसन इनामदार, इरफान इनामदार, मारोती जाधव, साहित्यिक रानबा गायकवाड,नागनाथ बडे, दत्ता वालेकर,बाजीराव धर्माधिकारी,    चंदुलाल बियाणी, ए.तु. कराड,प्रदीप भोकरे,प्रा. विलास रोडे, गोपाळ आंधळे,मोहन व्हावळे,अनंत इंगळे, रवी जोशी,सिध्दार्थभाऊ हत्तीआंबीरे,अमर हबीब,दगडू लोमटे,डॉ. राजेश इंगोले,डॉ. मुकुंद राजपंखे, पत्रकार अविनाश मुडेगावकर, डॉ. गणेश मुडेगावकर,मुरली फड, अमोल अरगडे,मिलिंद मस्के, राहुल हातागळे,डॉ. प्रवीण खरात,प्रा. विनोद लांडगे,प्राचार्य डॉ. अरुण दळवे, डॉ. मुंजाभाऊ धोंडगे,डॉ. बळीराम पांडे,डॉ. गणेश शिंदे,बा. सो. कांबळे, सिद्धेश्वर इंगोले,विजय जाधव,डॉ. गहिनीनाथ वळेकर,महादू सावंत,किशोर जांगडे,प्रा. कैलास पुपुलवाड, डॉ. तुकाराम देवकर, राहुल वानखेडे, राहुल पांडव, योगेश इरतकर,जॉन भालेराव, डॉ.शिवा वावळकर, डॉ. मिलिंद व्हावळे, डॉ. सतीश मस्के, डॉ. सतीश वाघमारे,प्रा. राज दवणे,प्राचार्य अरुण पवार, डॉ. राजकुमार यल्लावाड ,प्रा.डॉ. माधव रोडे, अनंत मुंडे, केशव कुकडे,प्रा. संजय आघाव,प्रा. डॉ. चंद्रकांत जोगदंड,गोविंद मुंडे,दत्ताभाऊ  सावंत, दत्ता लांडे,ब्रम्हानंद कांबळे,सुभाष वाघमारे, शैलेश लांडगे, दिवाकर जोशी,आसिफ अन्सारी,डॉ. सय्यद अमजद,  प्रा.रवींद्र जोशी,भगवान साकसमुद्रे,अ‍ॅड.
 दिलीप उजगरे, डॉ. संतोष रणखांब,
प्रा.विक्रम धनवे,डॉ. दयानंद झिंझुर्डे, डॉ. चंद्रशेखर कणसे,प्राचार्य सी. व्ही. गायकवाड,प्राचार्य डॉ. रमेश इंगोले,बालासाहेब इंगळे,प्रा. राम पेंटेवार ,भगवंत पवार,प्रा. राजाभाऊ होके, प्रा. बी.एम.खरात, ऍड.अमित गिरवलक,अरविंद दहीवाडे,दादासाहेब कसबे ,राजू वाघमारे,संतोष पोटभरे,डॉ. बबन मस्के, प्रा.शंकर सिनगारे,स्वप्नील सिद्धांती,अतुल कसबे,प्रा. संकेत तोरंबेकर,डॉ. दत्ता हिरवे, पंकज भटकर,डॉ. सचिन भूंबे ,डॉ. राम मोरे, प्रा. ज्ञानेश्वर खोडवे, प्रा. सत्यम पवार,पत्रकार महादेव गोरे,पत्रकार किरण स्वामी, शेख जावेद, शशिकांत कुलथे,मदन ईदगे ,सुनील जावळे,किशोर दहिवाडे, हरिदास घुंगासे,विकास वाघमारे,पृथ्वी शिंदे, नवनाथ दाणे, शेख गणी,निवृत्ती खंदारे, राजू डापकर, डॉ. योगेश कुलकर्णी, डॉ. लक्ष्मण जोगदंड, शशिकांत बडे,गणेश बुरांडे, धपाटे,डॉ. शशिकांत पाटील, डॉ. मारोती घुगे, डॉ. आर. के. राऊत, डॉ.गजानन अवचार, प्रा. रमेश होसुरकर,पत्रकार प्रा. तुळशीदास घोगरे, संभाजी घोगरे,संभाजी तांगडे,डॉ. संतोष आडे,डॉ. सचिन संगेकर, श्री. लक्ष्मीकांत पुंडलिक ,डॉ. काकासाहेब धायगुडे, प्रा. मनोज गवळी,डॉ. योगेश देसाई,अनंत आडसुळे, पत्रकार प्रमोद आडसुळे,पत्रकार शेखर मगर, गणेश नरवाडे, तुषार बोडखे,डॉ. धनंजय रायभोळे, डॉ. वीरा राठोड, डॉ. सुदाम राठोड,प्रा. रमेश वाघ यांचेसह ,विद्यार्थी,साहित्यिक, पत्रकार, कलावंत आदींनी प्रा.डॉ. सिद्धार्थ तायडे  यांचे अभिनंदन केले आहे.

परतीच्या पावसाने शेतकर्‍ यांच्या पिकात पाणी अन् डोळ्यातही ; शिंदे सरकार जागे व्हा असा टाहो

परतीच्या पावसाने शेतकर्‍ यांच्या पिकात पाणी अन् डोळ्यातही ; शिंदे सरकार जागे व्हा असा टाहो 



सोनपेठ (दर्शन) :-

शेतामध्ये सोयाबीन काढणी कापणीचे काम चालू असताना मध्येच पावसाने पचका केल्याने शेतकर्‍यांची चांगलीच फजिती झाली. सोनपेठ तालुक्यातील अनेक मंडळात तर आजही पावसाचे पाणी शेतात डबडब करत होतं. शेतकर्‍यांनी याच गुडघाभर पाण्यामधून उरलंसुरलं सोयाबीन बाहेर काढून धुर्‍यावर टाकलं. हातातोंडाशी आलेला घास डोळ्यादेखत भिजत असल्याने शेतकर्‍यांच्या डोळ्यांमध्ये अक्षरशः पाणी आलंं.सोनपेठ तालुक्यातील सर्वच मंडळांमध्ये परिसरामध्ये परतीच्या पावसाने वादळी वार्‍यासह विजेच्या कडकडाटामध्ये परतीचा जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे सोयाबीन कापसाचे अतोनात नुकसान झाले. काही ठिकाणी तर खळ्यामध्ये पाणी घुसल्याने काढलेले सोयाबीनही भिजले आहे. आज दुसर्‍या दिवशीदेखील शेतामध्ये पाणी साचून होतं. शुक्रवारी कापणी करून ठेवलेले सोयाबीन दुसर्‍या दिवशी शनिवारी  शेतकर्‍यांनी दिवसभर ते धुर्‍यावर उपसून ठेवलंं. एकंदरीतच सोयाबीनच्या काढणी कापणीमध्ये परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकर्‍यांंची फजिती झाली. सर्वत्र पाणीच पाणी झाल्याने बळीराजाचा दम कोंडला होता.शेवटि शेतकरी राजा परतीच्या पावसाने शेतकर्‍ यांच्या पिकात पाणी अन् डोळ्यातही आता तरी शिंदे सरकार जागे व्हा असा टाहो .