डिघोळच्या रेणुकामाता (त्रिदेवी) च्या दर्शनासाठी राज्यातून तोबा गर्दी
सोनपेठ (दर्शन) :- सोनपेठ तालुक्यातील मौजे डिघोळ येथील रेणुकामाता (त्रिदेवी) च्या शारदीय नवरात्री उत्सवात गुरुवार दिनांक 22 सप्टेंबर 2025 पासून घटस्थापना करून प्रारंभ झाला असून हा नवरात्री उत्सव पुढे दिनांक 2 ऑक्टोबर 2025 गुरुवार दसऱ्यापर्यंत सुरू राहणार आहे या उत्सवास समितीच्या गाण्याचे कार्यक्रम तसेच दररोज महाप्रसाद व इतर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे प्रति वर्ष प्रमाणे याही वर्षी सोनपेठ तालुक्यातील डीघोळ येथील रेणुकामाता (त्रिदेवी) मंदिरातील शारदीय नवरात्री महोत्सव प्रारंभ झाला असून यावेळी या उत्सवामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, दिघोळ येथे रेणुकामाता (त्रिदेवी) मंदिर सोनपेठ पासून परळी रोड कडे उजवीकडे असुन, मंदिर परिसरात सुशोभीकरणासाठी कमिटी तर्फे सदैव प्रयत्न करण्यात येत आहेत, मंदिरावर विद्युत रोषणाई सर्वत्र झगमगताना दिसत असून भाविकांच्या दर्शनासाठी लावली आहे सोनपेठ तालुक्यातुनच नाही तर परभणी जिल्हाभरातून व महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक भाविक भक्त या देवीच्या दर्शनासाठी येतात, मागील काही वर्षांपासून नवरात्री उत्सवात दर्शनासाठी येणारे भाविक भक्तांसाठी अन्नछत्र सुरू आहे दररोज वेगवेगळे अन्नदाता कडून अन्नदानाची दहा दिवस अखंड सेवा सुरू राहते, आज देशमुख परिवाराच्या वतीने महाप्रसादाचा लाभ घ्यावा उपसरपंच अजयकुमार देशमुख यांनी माहिती दिली,देवीच्या समोर दोन कल्लोळ असुन पूर्वीच्या काळी देवीच्या मंदिरासमोर पाण्याची सुविधा नसल्याने अनेक भाविक तसेच शाळा विद्यालयातील सहली दर्शनासाठी येताना भाजी भाकरी घेऊन येत व दर्शनानंतर देवीच्या समोर बसून जेवण केल्यानंतर या कल्लोळातील पाणी पिऊन तृप्त होत असतात परंतु सध्या देवीच्या समोर पाण्याची सुविधा उपलब्ध झाल्यामुळे आता या कल्लोळातील पाणी पिण्याचे प्रमाण कमी झाले आहे, या देवी मंदिरची स्थापना इ.स. 1600 मध्ये रामदास स्वामी यांनी केली असल्याचे सांगितले जाते, या ठिकाणी मोठ्या जत्रेचे स्वरूप प्राप्त झाल्याचे दिसून येत आहे, अनेक वर्ष व्यवसायिकांना रोजगार उपलब्ध झाला आहे, निजाम कालखंडापासून देवी मंदिराची देखभाल येथील देशमुख घराणे करत असून आजही विजयकुमार देशमुख, रमाकांत देशमुख, अण्णासाहेब देशमुख, उपसरपंच अजयकुमार देशमुख यांना आरती व पूजा तसेच शिलंगणाचा मान कायम आहे, या ठिकाणी अंबादास पुजारी, वैभव पुजारी व गावातील युवा तरुण नागनाथ शिंगाडे, सतीश पारेकर, कानिक अन्नपूर्णे, शाम काथवटे, माजी सरपंच गोकुळ दादा आरबाड, शरद मुळी, वैभव मोडीवाले, सुभाष मुंडीक यांच्या सह संपूर्ण गावकऱ्यांच्या सहकार्यातून हा महोत्सव साजरा केला जातो.
No comments:
Post a Comment