Saturday, September 21, 2024

शिक्षण महर्षी : कर्मवीर भाऊराव पाटील - अनिल भुसारी

शिक्षण महर्षी : कर्मवीर भाऊराव पाटील - अनिल भुसारी
सोनपेठ (दर्शन) :- महाराष्ट्राच्या मातीने अनेक विरपुत्रांना घडवले आहे. या विरपुत्रांची  यादी बनवायची महटल्यावर पेनाची शाई सुद्धा कमी पडेल. या पुत्रांनी देशाला आणि जगाला आश्चर्यचकित केले. अशा वीरांपैकीच एक नाव म्हणजे पायगोड़ा पाटील व गंगूबाई यांच्या पोटी 22 सप्टेंबर 1887 ला कुंभोज ता. हातकंणगले जि. कोल्हापुर  येथे जन्मलेले कर्मवीर भाऊराव पाटील. महाराष्ट्राच्या शैक्षणिक व सामाजिक सुधाराणांचा इतिहास कर्मविर भाऊराव पाटील उर्फ अण्णा या नावाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. 
कर्मविर भाऊराव पाटलांचे नाव माहित नाही असा महाराष्ट्राच्या मातीत एकही नाव सापडणार नाही. या अवलियाने "शिक्षण हा जीवनाचा पाया आहे' हे ओळखून खेडया-पाडयातील, डोंगराळ, दुर्गम भागातील बहुजनांची मुले शिकली पाहिजेत म्हणून स्वत: गावोगावी फिरून  त्यांना शिक्षणाचे महत्व सांगितले. गरिब -श्रीमंत, जात-धर्म असा भेद न करता, स्वत:च्या घराला वास्तिगृह बनवून मुलांना शिक्षणाची सोय उपलब्ध करुन दिली. पुढे दातृत्ववान व्यक्तिकडून देनग्या गोळा करुन (उदा. धोन्डाजी भोसले, मलोजीराजे निम्बालकर, सयाजीराव गायकवाड, छत्रपती राजर्षी शाहूजी महाराज, श्रीमंत यशवंतराव होळकर, गवालीहरचे श्रीमंत जिजाजीराव शिंदे, संत गाडगेबाबा) बायकोच्या (वाहिनीसाहेब लक्ष्मीबाई) अंगवारचे दागिने मोडून वास्तिगृह, शाळा व महाविद्यालय उभारून शिक्षणाची बीजे तळागाळात रुजविले 'कमवा आणि शिका' हा मंत्र घेऊन 4 ऑक्टोंबर 1919 ला 'रयत शिक्षण संस्थेची' स्थापना केली.  ज्याना शिक्षण काय? हे माहित नव्हते.  अशा बहुजनांच्या मुलांना उत्तम नागरिक होता यावं याकरिता प्राथमिक शिक्षण ते उच्च शिक्षण देणाऱ्या शाळा महाविद्यालय काढले. शाळेत प्रशिक्षिक शिक्षक असाव म्हणून "महात्मा फुले अध्यापक विद्यालयाची" स्थापना केली, पुरुषांच्या प्रशिक्षणाप्रमानेच स्त्रियांकरिता "जिजामाता अध्यापिका विद्यालय" स्थापन केले. आज या रयत शिक्षण संस्थेचीं 439 माध्यमिक विद्यालय आहेत. पुढे माध्यमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर उच्च महाविद्यालयिन शिक्षण घेण्यकरिता  पुणे, कोल्हापुर, मुम्बई, बेलगाव, सांगली, बड़ोदा या ठिकाणी विद्यार्थ्याना जावे लागत असे,  त्याकरिता मुलांना व पालकांना खूप परिश्रम घ्यावे लागयाचे. यावर उपाय म्हणजे स्वतःच महाविद्यालय स्थापन करणे आणि अण्णानी 1947 मध्ये सातारा येथे "छत्रपती शिवाजी महाराज" हे महाविद्यालय स्थापन केले. इथेच न थांबता 1954 मध्ये सैदापुर ता. कराड सारख्या गावात महाविद्यालयची स्थापना करुन उच्च शिक्षणात क्रांतीच केली. आज या रयत शिक्षण संस्थेची 40 महाविद्यालय आहेत. अन्नानी शिक्षणाचे पेरलेले हे बीज आजही अंकुरत आहे. अन्नानी शिक्षणाच्या क्षेत्रात केलेल्या या कार्यामुळे अनेक लोक प्रभावित झालेत, त्यांचा आदर्श घेऊन  शाळा-महाविद्यालये ग्रामीण भागात सुरु करुन शिक्षणाचा प्रवाह सामान्य जनापर्यन्तपोहचविण्याचे कार्य केले. त्यातील एक नाव म्हणजे भाऊसाहेब डॉ. पंजाबराव देशमुख यांनी "शिवाजी शिक्षण संस्थेच्या' माध्यमातून बहुजनांना शिक्षणाची दारे उघड़ी करुन दिली. 
कर्मवरांच्या आयुष्यातील एक प्रसंग म्हणजे. छत्रपती शिवाजी महाराज हे कर्मवीर अण्णांचे
 प्रेरणास्थान. त्यांच्या स्मरणार्थ १९४७ साली सातारा येथे त्यांनी शिवाजी महाराजांच्या नावे महाविद्यालय सुरू केले. महाविद्यालयामध्ये ध्येयवादी व कर्तृत्ववान रयतसेवक निर्माण व्हावे हे भाऊरावांचे ध्येय होते. एका धनिकाने भाऊरावांना शिवाजी महाराजांचे नाव बदलून महाविद्यालयास आपले नाव देण्याच्या मोबदल्यात दोन लाख रुपये देऊ केले. तेव्हा भाऊराव म्हणाले, 'एक वेळ मी माझ्या जन्मदात्या बापाचे नाव बदलेन, पण कॉलेजला दिलेले महाराजांचे नाव कदापि बदलणार नाही'. महाराजांवर भाऊरावांची केवढी ही श्रद्धा.

अन्नानी हा शिक्षणाचा बहुजनकरिता डोलारा उभारला तो एवढ्या सहजासहजी उभरल्या गेला नाही. त्यासाठी अण्णाना प्रचंड संघर्ष करावा लागला. प्रस्थापितांचा विरोध स्विकारवा लागला,ल. अनेक संकटांना सामोरे जाऊंन त्या संकटांना पायदळी तुडवून बहुजनाकरिता हे शिक्षण केंद्र उभारले.
भाऊराव हे मानवतेचे पुजारी, सामाजिक मुक्तिचे पुरस्कर्ते, शिक्षणाचार्य होते. लोकशिक्षणाचे सार्वत्रिकीकरण हा त्यांचा ध्यास होता. 'रयतेचे सेवक' ही पदवी ते स्वत: सहीखाली नेहमी लिहीत. पण जनतेने त्यांना 'कर्मवीर' ही पदवी बहाल केली आणि खऱ्या अर्थाने त्यांचा सन्मान केला. असा हा महान समाजसेवक आपल्या कार्याचा अमुल्य असा ठेवा आपल्या पदरात टाकून, ग्रामीण शिक्षणाची नवी दिशा दाखवून ९ मे १९५९ रोजी अंतर्धान पावला. रयतेच्या या सेवकास त्यांच्या जन्मदिनानिमित्त विनम्र 
अभिवादन ! 
===== अनिल भुसारी ===== 
तुमसर, जि. भंडारा
विभागीय अध्यक्ष, मराठा सेवा संघ

No comments:

Post a Comment