ओबीसींच्या जनजागृती व एकजुटीसाठी प्रबोधन मंडल यात्रेचे सोनपेठ येथे जंगी स्वागत
ओबीसींच्या जनजागृती व एकजुटीसाठी प्रबोधन मंडल यात्रा ओबीसी आरक्षण बचाव संघर्ष समिती, परभणी.आयोजित ही यात्रा परभणी जिल्ह्यातील ओबीसी चळवळीच्या इतिहासातील अविस्मरणीय यात्रा ठरणार आहे.या यात्रेचे दि.२८ फेब्रुवारी २०२३ मंगळवार रोजी सोनपेठ शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सायंकाळी ठिक ६ वाजता सर्व जातींच्या ओबीसी समाज बांधवांनी यात्रेतील भगवान वाघमारे,स्वराजसिंह परीहार,नाना राऊत,किर्तीकुमार बुरांडे सह अनेक समाज बांधवांचे जंगी स्वागत करण्यात आले व सोनपेठ तालुका संयोजक सुभाषआप्पा नित्रुडकर यांनी आभार व्यक्त केले.ओबीसी आरक्षणाच्या हक्कासाठी काही दिवसापूर्वी परभणी येथे काढण्यात आलेल्या भव्य ओबीसी मोर्चाला जिल्ह्यातील तमाम ओबीसी समाजाने अतिशय भरभरून प्रतिसाद दिला होता.अर्थात तुम्ही सर्वांनी देखील तो मोर्चा यशस्वी करण्यासाठी मनापासून प्रयत्न केले होते.आणि त्या सगळ्या अक्रोशाचे फलीत म्हणुन आपले राजकीय आरक्षण आपल्याला पुन्हा परत मिळाले आहे परंतू त्यासाठी नेमण्यात आलेल्या बाटीया आयोगाने नोंदविलेल्या निष्कर्षात आणि गांव पातळीवर माहिती संकलित करणाऱ्या यंत्रनेच्या हातुन जाणीवपूर्वक काही चुका करण्यात आल्या आहेत त्यामुळे ओबीसी आणि भटक्या विमुक्त समाजाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात कमी दाखवण्यात आली आहे.परिणामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत ओबीसींच्या जागांना फटका बसला आहे.पूर्वीच्या जनगणनेत जामची लोकसंख्या ५२% असतांना २०२२ च्या आकडेवारीत ती ३७% कशी दाखवण्यात आली. वास्तविक पाहता पूर्वीच्या लोकसंख्येपेक्षा आत्ताच्या लोकसंख्येत वाढ होने अपेक्षित असताना ती घटली कशी ? हा जवाब आम्हाला शासनाला विचारायचा आहे.त्याच बरोबर ओबीसींची जातीनिहाय जनगणना करा ही गेल्या कित्येक दिवसाची आपली मागणी आहे परंतू शासन जाणीवपूर्वक त्या मागणीकडे दुर्लक्ष करत आहे.शासन कोणतेही असो त्यांनी कायम ओबीसींची दिशाभूल करण्याचे आणि त्यांना खेळवत ठेवण्याचेच काम केले आहे.या साऱ्या गोष्टीकडे आता आपल्याला डोळे उघडे ठेऊन पहावे लागणार आहे.जो पर्यंत आपण आपल्या मागण्यांसंदर्भात उग्र होणार नाहीत तोपर्यंत शासन व्यवस्था आपली हेळसांड थांबवणार नाही त्यासाठी आधी आपल्यातील विखुरलेल्या शक्तीला एकत्र करून परस्परात एकजुटीची भावना निर्माण करुन खालील जिव्हाळ्यांच्या मागण्यांसंदर्भात आपल्या ओबीसी बांधवात जनजागृती करावी या उदात्त हेतूने ही प्रबोधन मंडल यात्रा काढण्यात आली आहे.सदर मंडल यात्रा परमणी जिल्हातील सर्व तालुके आणि त्या मार्गावरील मोठ्या गावावरून जाणार आहे. ही यात्रा परभणी जिल्ह्यातील ओबीसी चळवळीच्या इतिहासातील अविस्मरणीय यात्रा ठरणार आहे.या यात्रेचे स्वागत सोनपेठ शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे रांगोळी तुन सुस्वागतम, यात्रेतील सहभागी सर्व समाज बांधव यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत तर रथास सोनपेठ संयोजक सुभाषआप्पा नित्रुडकर यांच्या हस्ते पुष्पहार घालून करण्यात आले.मागण्या (१) ओबीसीचे संपूर्ण आरक्षण कायम ठेवा.२) ओबीसींची जातनिहाय जनगणना करा.३) मंडल आयोगाच्या संपूर्ण शिफारशी लागु करा.४) बाटीया आयोगासाठी संकलित केलेल्या माहितीची सत्यता तपासा.घोषणा देऊन परीसर दणाणून सोडला यामध्ये सर्व जातींच्या ओबीसी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला या सर्वांचे आभार सोनपेठ तालुका संयोजक सुभाषआप्पा नित्रुडकर यांनी व्यक्त केले.याप्रसंगी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.




No comments:
Post a Comment