Friday, April 26, 2024

बीड लोकसभा पंकजाताई मुंडे यांना धोक्याची घंटा ; रयत क्रांती संघटना हा मित्र पक्ष नाराज.....

बीड लोकसभा पंकजाताई मुंडे यांना धोक्याची घंटा ; रयत क्रांती संघटना हा मित्र पक्ष नाराज.....

बिड/परभणी/सोनपेठ(दर्शन):- 

साप्ताहिक सोनपेठ दर्शन बातम्या व जाहिराती साठी संपर्क साधावा संपादक किरण रमेश स्वामी मो.9823547752..

लोकसभेचे बिगुल वाजल्यापासून महायुतीतील मित्रपक्ष पंकजाताईंच्या प्रचाराला लागले. मात्र प्रस्थापित पक्षाच्या आमदारांच्या जीवावर आपण लोकसभा भरघोस मतांनी निवडून येऊ या गैरसमजातून ताई निवडणूक लढताना दिसत आहेत . यातून मित्र पक्षांना डावलून ज्या पद्धतीने पंकजाताई प्रचार दौरे करत आहे त्याची परिणीती मित्रपक्षाच्या नाराजी मध्ये होत आहे.
परभणी लोकसभेचे उमेदवार महादेव जानकर यांचा फॉर्म भरण्यासाठी रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष माजी मंत्री सदाभाऊ खोत बीड जिल्हा मार्गे परभणीला आले होते. त्यावेळी केज व माजलगाव या ठिकाणी रयत क्रांती संघटना तथा पक्षाच्या बैठका घेऊन बीड जिल्ह्यात मित्रपक्ष या नात्याने महायुतीचा धर्म पाळायचा आणि बीड लोकसभा उमेदवार पंकजाताई यांना प्रचंड बहुमताने निवडून आणायचा असा आदेश दिला. 
त्यानुसार बीड जिल्ह्यातील अकरा तालुक्यातील तालुकाध्यक्ष तथा सर्व आघाड्या कामाला लागल्या.  मात्र पंकजाताई व धनुभाऊ महायुती धर्म पाळायला कमी पडत आहेत का काय असा प्रश्न पडतो. कारण गेला महिनाभरापासून महायुतीचा प्रचार दौरा तथा ठीक ठिकाणी सभा होत आहेत मात्र महायुतीच्या बॅनरवर रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष माजी मंत्री सदाभाऊ खोत तसेच राज्य प्रवक्ते तथा बीड जिल्हा अध्यक्ष शेतकरी नेते संदिप दादा वाहूळे यांचा फोटो कुठल्याच सभेच्या बॅनरवर दिसला नाही. यामुळे बीड जिल्ह्यातील संघटनेचे कार्यकर्ते तथा पदाधिकारी नाराज आहेत असे कळते.  
बीड जिल्हा अध्यक्ष यांच्या म्हणण्यानुसार महायुती किंवा त्याचे उमेदवार यांचा अजून कोणाचाही संपर्क झाला नाही किंवा त्यांचा स्वतः होऊन अजून कोणीही संपर्क केलेला नाही. जिल्हा अध्यक्ष म्हणतात पंकजा ताई यांना गेली 15 दिवस झाले संपर्क करण्याचा प्रयत्न  करत आहोत मात्र त्यांचे पदाधिकारी ,स्विय सहाय्यक तसेच जवळचे लोक त्यांचा संपर्क होऊ देत नाही. यामागे काय गौडबंगाल आहे देव जाणे. ताईच्या सोबतचे प्रतिनिधी ताईची सुपारी तर घेऊन नाहीत ना अशी शंका येत आहे,  किंवा श्रेय घेण्याचा स्पर्धेत इतरांना जवळ येऊ न देण्याची त्यांची भावना ताईंना पराभवाच्या छायेत टाकताना दिसत आहे.
पंकजाताई किंवा त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी घेतलेले धनंजय मुंढे साहेब यांनी अजून संपर्क केलेला नाही उलट संघटनेचे पदाधिकारी संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र समोरून कोणताच प्रतिसाद येत नाही यावरून त्यांना महायुती मधील घटपक्ष कोण कोण आहेत याची माहिती यांना नाही किंवा जाणीवपूर्वक टाळत आहेत हा प्रश्न पडतो. यामुळे पुढे ताईंच्या प्रचाराचे काम चालू ठेवायचे का  बंद करायचे  यावर सोमवारी सायंकाळपर्यंत संघटनेची बैठक घेऊन निर्णय होईल असे कळते.
आजपर्यंतच्या निरिक्षणानुसार असे जाणवते की पंकजाताई यांनी मित्रपक्षांना कुठलाही संपर्क केलेला नाही. फक्त रयत क्रांती संघटनाच नाही तर इतरही मित्रपक्ष ताईवर नाराज चाललेले आहेत .
रयत क्रांती संघटना बीड जिल्ह्यात अकरा तालुक्यात सर्व आघाड्यांवर कार्य करत आहे. बीड मधील सहा मतदारसंघाचा विचार केला तर प्रत्येक मतदार संघात  संघटनेचे  10,000+ एवढी म्हणजे सरासरी किमान 40,000+ ची लीड देऊ शकू एवढी आमची ताकत आहे. प्रत्येक मतदार संघातील आजी, माजी आणि उत्सुक आमदारकीचे उमेदवार यांनी आपापल्या मतदार संघात ताईच्या सभा घेतल्या मात्र त्यांच्या बॅनरवर आणि भाषणात संघटनेचा उल्लेख आला नाही तेव्हा यांना ही आमचे आव्हान आहे की तुम्ही आम्हाला डावलू शकत नाही. 
गेल्या 20 दिवसाच्या  निरीक्षणानंतर आणि फॉर्म भरतानाच्या प्रचार सभेत रयत क्रांती संघटनेचा झालेला अनुल्लेख तसेच  शेतकऱ्यांचे कैवारी सदाभाऊ खोत यांचा नसलेला फोटो असे महायुतीचे वर्तन पाहता असे जाणवत आहे की पंकजाताई यांना मित्र पक्षाची जी महाराष्ट्रातील सर्वात ॲक्टिव शेतकरी संघटना आहे यांची गरज नाही . 
रयत क्रांती संघटना ही शेतकरी संघटना आहे. शेतकरी कष्टकरी कामगार यांच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरून काम करणारी संघटना आहे. प्रस्थापितांच्या विरुद्ध विस्थापितांची बाजू मांडणारी , सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी लढणारी, लोकशाही बळकट करण्यासाठी लढणारी संघटना आहे. कोरोना काळातील माझे घर हेच माझे आंदोलनाचे रणांगण या टॅग लाईन खालील आंदोलन, महविकास आघाडी काळात एस टी आंदोलन,  ऊसदर वाढीसाठीचे आंदोलन, एक रकमी FRP साठी आंदोलन , दोन कारखान्यातील हवाई अंतर कमी करण्यासंदर्भातील आंदोलन, शिंदे सरकार काळातील दूध दरवाढीसाठी चे  यशस्वी आंदोलन, सैन्यभरती, mpsc भरतीसाठी केलेले आंदोलन हे काही आणि यासारखी अनेक यशस्वी आंदोलने आहेत.
मात्र असे असताना तुम्ही आम्हाला जिल्ह्यात डावलत असाल तर आम्ही जिल्हा स्थरावर  वेगळा निर्णय घेऊ. कारण महायुती धर्म पाळण्याचा ठेका फक्त आम्ही घेतलेला नाही .तुम्ही योग्य सन्मान दिला तर एकवेळ घरची भाकरी चटणी बांधून तुमचा प्रचार करू मात्र स्वाभिमानाशी तडजोड करायची नाही अशी कार्यकर्त्यांची भावना आहे.

No comments:

Post a Comment