Tuesday, November 25, 2025

सोनपेठ शहरात माजी खासदार इम्तीयाज जलील यांची एम.आय.एम.उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहिर सभा

सोनपेठ शहरात माजी खासदार इम्तीयाज जलील यांची एम.आय.एम.उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहिर सभा
सोनपेठ (दर्शन) :- 

सोनपेठ शहरात दिनांक 27/11/2025 गुरूवार रोजी औरंगाबाद येथील एम आय एम AIMIM पक्षाचे माजी खासदार इम्तीयाज जलील साहेब यांची जाहिर सभा होणार आहे, सोनपेठ नगर परिषद सावंत्रिक निवडणूक 2025 साठी एम आय एम पक्षाने नगराध्यक्ष पदासाठी तौसीफ अली शेर कुरैशी यांच्या प्रचारार्थ माजी खासदार इम्तीयाज जलील साहेब यांची जाहिर सभा शहरातील अहिल्याबाई होळकर चौकात ठिक दुपारी 3 वाजता आयोजित करण्यात आली आहे.या सभेत एम आय एम पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत अशी प्रतिक्रिया पक्षाचे परभणी जिल्हा समन्वयक मोहम्मद गौस झैन साहेब व सोनपेठ,मानवत प्रभारी हाफेज अलीशेर कुरेशी यांनी दिली आहे.

Saturday, November 22, 2025

महाराष्ट्राच्या राजकारणात गुंड कसे आले......? (हेरंब कुलकर्णी)

महाराष्ट्राच्या राजकारणात गुंड कसे आले......? (हेरंब कुलकर्णी)
न्यूज 18 लोकमत या चॅनेलवर आज विलास बडे यांनी घेतलेल्या बडे मुद्दे चर्चेत नगरपालिका निवडणुकीत होत असलेले गुन्हेगारीकरण यावर चर्चा झाली.. त्यात गुन्हेगार राजकारणाकडे का येऊ लागले याचे विश्लेषण करता आले... ते मांडताना मी व पु काळे यांची एक प्रसिद्ध कथा सांगितली..

 रात्रीच्या वेळी एका रातराणी बस मध्ये झोपताना हात अवघडू नये म्हणून ते एसटीच्या मधल्या दांडीवर टांगून ठेवण्याची सोय असते. एक गुंड आणि लेखक प्रवास करताना सकाळी दोघांच्या हाताची अदलाबदल होते. गुंड पुस्तके लिहू लागतो आणि लेखक खिसे कापू लागतो. वैतागून लेखक गुंडाला गाठतो आणि हात परत मागतो. तेव्हा गुंड म्हणतो की माझ्याकडे पैसा होता पण प्रतिष्ठा नव्हती आणि तुमच्याकडे प्रतिष्ठा होती पण पैसा नव्हती. तेव्हा दोघांचेही आता बरे चालले आहे...
 मला असे वाटते की गुंडांचा राजकारणातला प्रवेश हा या मानसिकतेतून झाला आहे.राजकारणी पूर्वी गुंडांशी आणि धनिकांशी अंधारात संबंध ठेवायचे आणि बदनामी मात्र गुंडांची व्हायची...गुंडांच्या हे लक्षात आले की आपण बदनामी झेलण्यापेक्षा आणि पाठीमागून मदत करण्यापेक्षा थेट आपणच राजकारणात आलो तर कुठे बिघडले ?

धनिक सुद्धा तोच विचार करतात.त्यामुळेच शहरी भागातले बिल्डर आणि ग्रामीण भागातले ठेकेदार आज स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आपल्याला जास्त दिसतात कारण नेत्यांना पैसा देण्यापेक्षा आपलाच पैसा लावून आपणच का निवडून येऊ नये ? अशी त्यांची मानसिकता झाली आहे..
सर्वात वाईट हे आहे की नगरपालिका,महापालिका, जिल्हा परिषद या निवडणुकांना नेतृत्वाची कार्यशाळा असे म्हटले जाते.उद्याचे आमदार,खासदार यातून घडतात असे सांगितले जाते. ते खरे ही आहे विलासराव देशमुखांसारखा माणूस सरपंचांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत प्रवास करतो. देवेंद्र फडणवीस नगरसेवक हे मुख्यमंत्री असा प्रवास करतात. अशा महाराष्ट्रात आज अशा प्रकारचे गुंड जर स्थानिक स्वराज्य संस्थेतून निवडून येणार असतील तर उद्याचे आमदार, खासदार कसे असतील ? याची कल्पनाही करवत नाही....

 बिहारची बदनामी आपण का करतो ? महाराष्ट्राचा बिहार होऊ देणार नाही हा बकवास आता बंद केला पाहिजे...बिहारच्या 2020 च्या निवडणुकीत 68% उमेदवार आमदार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे होते ते प्रमाण 15% ने या निवडणुकीत कमी झाले आणि महाराष्ट्रातील 41 टक्के आमदारांवर मात्र वेगवेगळे गुन्हे आहेत.. तेव्हा बिहारचाच महाराष्ट्र होतो काय असा प्रश्न पडतो..?

 देशपातळीवर 1993 साली राजकारणाचे गुन्हेगारीकरण यावर चर्चा करण्यासाठी व्होरा समिती नेमली होती.. या समितीतील तपशील इतके भयंकर आहेत . आजपर्यंत एकाही सरकारने या समितीचा अहवाल संसदेसमोर ठेवला नाही किंबहुना मध्यंतरी माहितीच्या अधिकारात रिपोर्ट मागितल्यावर तो उपलब्ध नाही असे उत्तर देण्यात आले... तेव्हा महाराष्ट्राच्या राजकारणाचा विचार निवडणूक यांच्या पलीकडे जाऊन केला पाहिजे आणि सर्वपक्षीय नेत्यांनी उद्याच्या महाराष्ट्राचा विचार करून अशा गुंडांना दूर ठेवण्याची गरज आहे 

दुर्दैवाने तुमचा दाऊद तर आमचा गवळी अशी भाषा शिवसेनेने वापरली त्यानंतर १९९० च्या निवडणुकीत कलानी आणि ठाकूर यांना काँग्रेसने तिकीट दिले त्याचे समर्थन करताना पवारांनी त्यांच्याकडे इलेक्ट्रिक मेरिट होते असे समर्थन केले आणि त्यानंतर मात्र राजकारणाचा तोल गेला...

 सामना चित्रपटात मारुती कांबळे चे काय झाले..?  हा प्रश्न सामान्य माणूस अखेरपर्यंत विचारत राहतो.. येणाऱ्या निवडणुकीत मतदारांनी अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्यांना मारुती कांबळे ची काय झाले हे विचारले पाहिजे आणि सरसकट गुंडांना पराभूत केले पाहिजे तरच उद्याचा महाराष्ट्र हा सुसह्य असेल......१०५ हुतात्म्यांनी असे गुंड सत्तेवर यावेत म्हणून जीव दिला का....?

हेरंब कुलकर्णी

Saturday, November 15, 2025

सोनपेठ शहर परिवर्तन आघाडी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार परमेश्वर कदम - युवा नेते सुमित पवार समोर घरफोड्या आहे ; आपले सर्व मतभेद विसरून एकत्र आलोत तसा विजयश्री खेचून आणू - मा.आ.व्यंकटराव कदम

सोनपेठ शहर परिवर्तन आघाडी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार परमेश्वर कदम - युवा नेते सुमित पवार        
समोर घरफोड्या आहे ; आपले सर्व मतभेद विसरून एकत्र आलोत तसा विजयश्री खेचून आणू - मा.आ.व्यंकटराव कदम
सोनपेठ ( दर्शन ) :- सोनपेठ शहरातील परळी रोड स्थित एल. आर. के. इंग्लिश स्कूलच्या प्रांगणात दिनांक 9/11/2025 रविवार रोजी सायंकाळी ठीक 7 वाजता सोनपेठ शहर परिवर्तन आघाडी कार्यकर्ता संवाद बैठक आयोजित करण्यात आली होती, भाजपा प्रमुख पालकमंत्री मेघना बोर्डीकर, मा.आ.सुरेश वरपुडकर,कॉग्रेसचे मा.आ.बाबाजानी दुर्राणी, शिवसेना (उबाठा) चे खा.संजय जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मा.आ.व्यंकटराव कदम व शिवसेना नेते सईद खान यांच्या मार्गदर्शनात अशा पाच पक्षाची सोनपेठ शहर परिवर्तन आघाडी कार्यकर्ता संवाद बैठकीचे अध्यक्ष काँग्रेस ज्येष्ठ नेते सनदी अधिकारी बळीराम पवार, प्रमुख मार्गदर्शक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश चिटणीस मा.आ.व्यंकटराव कदम, प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पांडुरंग तात्या कदम,योगेश कदम, अक्षय कदम, काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी उपनगराध्य दत्ताराव कदम, प्रभाकर शिरसाट, सतीश देशमुख, युवा नेते सुमित पवार, परमेश्वर कदम, राजेभाऊ अंबुरे, राजू सौदागर, खदिर अन्सारी, रामेश्वर कदम, युवक शहर अध्यश शुभंम कदम, भाजपाचे रंगनाथ सोळंके प्रा.डॉ.मंजुभाऊ धोंडगे, मल्लिकार्जुन सौंदळे, संतोष अंबुरे, डॉ.मोहनराव देशमुख, मारोती रंजवे, नितेश लष्करे, युसुब चौधरी, शिवसेना (उबाठा) पक्षाचे भगवान पायघन, संतोष गवळी, जनार्धन (नाना) झिरपे, कृष्णा पिंगळे, शिवसेना साजेद कुरेशी, सुशील सोनवणे, विश्वजित कदम आदिसह ईच्छुक उमेदवार विचार मंचावर उपस्थित होते, कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष अंबुरे यांनी केले, याप्रसंगी सोनपेठ शहर परिवर्तन आघाडी नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराची काँग्रेस युवा नेते सुमित भैय्या पवार यांनी परमेश्वर कदम यांचे नाव जाहीर करून दोघांनी हात उचावूध घोषणा केली,सर्वांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले,यावेळी मनोगत शिवाजी कदम, साजेद कुरेशी, संतोष गवळी, रंगनाथ सोळंके, प्रभाकर शिरसाट, सतीश देशमुख, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार परमेश्वर कदम, प्रमुख मार्गदर्शक माजी आमदार व्यंकटराव कदम यांनी मार्गदर्शन करताना भावनिक साथ घालत प्रथम सर्व उपस्थिताना दंडवत करत स्वागत केले, सविस्तर मार्गदर्शनाच्या शेवटी समोर घरफोड्या आहे हे विसरू नका, आपण सर्व मतभेद विसरून एकत्र आलोत तसा विजयश्री खेचून आणू असे आवाहन केले, अध्यक्ष समारोप करताना काँग्रेस नेते माजी सनदी अधिकारी बळीरामजी पवार यांनी बोलताना सोनपेठकरांना साधे स्वच्छ पिण्याचे पाणी मिळत नाही आणि त्याचा तुम्ही आवाज काढत नाहीत हे अकलनीय आहे, आपण सर्व रोज 20 रुपये खर्च करून पाच वर्षाचे किती रुपये होतात हा प्रत्येकाने हिशोब करावा आणि समोरचा किती देतो हे पाहावे, आम्ही वातावरण निर्माण केले,आमच्या परिवाराला पदाचा हव्यास नाही, परमेश्वर कदम मला सुमित सारखाच परमेश्वर कदम यांनी शिक्षणाची सर्वोत्तम सेवा सोनपेठकरांना उपलब्ध करून दिली, असाच बदल सोनपेठ शहरात घडवू, सर्व सोयी शहरात उपलब्ध करू, निवडणुकीत सोबत राहणार, समोरचे बुद्धिभेद जातिवाद करतील बांधवांनो जगात दोनच जाती एक स्त्री व दुसरी पुरुष आम्ही सर्व काहीतरी सोनपेठ शहराचं चांगलं करण्यासाठी एकत्र आलो आहोत, प्रत्येकाने परमेश्वर कदम म्हणजे मीच नगराध्यक्ष आहे असे समजून काम करावे, समारोपप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेश चिटणीस पदी नुकतीच मा.आ.व्यंकटराव कदम यांची निवड झाल्याबद्दल सोनपेठ शहर परिवर्तन आघाडी सर्व प्रमुखांनी शाल व पुष्पहार घालून अभिनंदन केले.या कार्यक्रमाचे अप्रतिम सूत्रसंचालन मारोती रंजवे यांनी केले,समारोप अल्पोपहाराने करण्यात आला.
-------------------------------------------------------------------
सोनपेठ शहर परिवर्तन आघाडी मध्ये यावेळी सोनखेड व आदर्शनगर तांडा, सोनखेड तांडा येथील मुस्लिम व बंजारा समाज बांधवांनी प्रवेश घेत सागितले की परमेश्वर कदम यांच्या संस्थेमुळे आमची मुलं शिकून डॉक्टर झाली, अधिकारी झाली, तेव्हा आम्हाला आमची मुल बाहेरगावी शिकवण्याची परिस्थिती नव्हती आज त्याचेच ऋण फेडण्याची वेळ आली आहे.मुलांच्या आग्रहस्तव आम्ही तन-मन-धनाने परमेश्वर कदम सोबत आहोत.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

Tuesday, November 4, 2025

माजी आमदार व्यंकटराव कदम राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती

माजी आमदार व्यंकटराव कदम राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती
सोनपेठ (दर्शन) :- 
सोनपेठ येथील माजी आमदार व्यंकटराव आनंदराव कदम यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती केल्याची घोषणा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी मंगळवारी (दि.4) केली. 
या नियुक्तीबद्दल महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष खासदार फौजिया खान, माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर, माजी आमदार विजयराव गव्हाणे, प्रदेश उपाध्यक्ष तथा प्रवक्ता डॉ.भीमराव हत्तीअंबीरे, पक्षाचे परभणी जिल्हाध्यक्ष अजयराव गव्हाणे, शिक्षक सेलचे राज्यप्रमुख प्रा.किरण सोनटक्के यांनी अभिनंदन केले आहे. पक्षाची धैयधोरणे तसेच राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार यांचे विचार सर्वदूर पोहचविण्यासाठी सतत प्रयत्नशिल राहण्याची अपेक्षा या नियुक्तीपत्रात करण्यात आली आहे.